शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आठ वर्षांत अदाणी-अंबानींचाच विकास; भाजपने देश विकायला काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 17:06 IST

Nagpur News भाजपने तर देश विकायला काढला आहे. देशात मागील आठ वर्षांत केवळ पंतप्रधान मोदी यांचे मित्र अदाणी-अंबानी यांचाच विकास झाल्याचा आरोप उत्तर प्रदेश विधिमंडळ काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांनी बुधवारी येथे केला.

नागपूर : जगातील तिसरी अर्थव्यवस्था असा टेंभा मिरविणाऱ्या भाजपने या देशाची धुळधाण केली आहे. देशाच्या विकासाचा पाया माजी पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरूंनीच रचला आहे. भाजपने तर देश विकायला काढला आहे. देशात मागील आठ वर्षांत केवळ पंतप्रधान मोदी यांचे मित्र अदाणी-अंबानी यांचाच विकास झाल्याचा आरोप उत्तर प्रदेश विधिमंडळ काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांनी बुधवारी येथे केला. काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोडो' अभियानासाठी त्या नागपुरात आल्या असता पत्रपरिषदेत बोलत होत्या.

२०१४ मध्ये १० टक्के श्रीमंतांकडे ६४ टक्के संपत्ती होती. आता ५० टक्के संपत्ती ५ टक्के धनधांडग्यांकडे आहे. बंदरे, विमानतळ, रेल्वे, वीज उत्पादन केंद्र, कोळसा खाणी मित्रांना खैरात म्हणून वाटल्या. बंदरांमध्ये अरबो रुपयांचे जप्त होणारे ड्रग्जचे व्यवहार कोणाचे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. दरवर्षी दोन कोटींचे रोजगार कुठे आहेत. दहा लाख सरकारी नोकऱ्या रिक्त असताना नोटाबंदी व कोरोनामुळे नोकऱ्या हिसकावल्या. महागाई, रोजगार आज अत्युच्च शिखरावर आहे. यासारखे मुख्य मुद्दे भरकटविण्यासाठीच भाजप वेगवेगळे मुद्दे पुढे करते, असा आरोपही त्यांनी केला.

- कार्यकर्ते घरोघरी जातील

भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून आज, २६ जानेवारीपासून देशभरात काँग्रेसचे 'हाथ से हाथ जोडो' अभियान सुरू होत आहे. राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर एकाचवेळी हे अभियान सुरू होत आहे. नकारात्मक राजकारणाला प्रेम, एकतेचे प्रत्युत्तर म्हणून भारत जोडो यात्रा होती. यात तरुण, महिला, वृद्ध व मुलेही सहभागी झाली. काँग्रेसशी संबंधित नसणारे दिल्लीतील २७ हजार नागरिक यात्रेत होते. आता कार्यकर्त्यांची वेळ आहे. घरोघरी जाऊन देशातील ज्वलंत प्रश्न, काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी तीन वर्षांत केलेले काम व आगामी दोन वर्षांतील प्रस्तावित कामे मांडून नागरिकांचे जिवाभावाचे प्रश्न या अभियानातून सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस