शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

हनुमान चालीसा पठणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, कोणी जर रोखत असेल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 5:09 PM

देशभरात कुठेही हनुमान चालीसा म्हणण्यावर बंदी नाही आणि बंदी येऊही शकत नाही. पण, जर कुठे अशी बंदी येत असेल तर ते योग्य नाही, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले. 

नागपूर : राणा दाम्पत्याचे आज दिल्लीहून नागपुरात आगमन झाले. अमरावतीला जाण्यापूर्वी त्यांनी नागपुरातील रामनगरमधील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केले. दरम्यान, राणा दाम्पत्याने महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीकाही केली. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

राणा दाम्पत्य नागपुरात आल्यावर काय घडले, याची मला कल्पना नाही. मात्र, देशात असो वा राज्यात कुठेही हनुमान चालीसा म्हणण्यावर बंदी नाही आणि येऊही शकत नाही. पण, जर कुठे अशी बंदी येत असेल तर ते योग्य नाही. कोण कोणाला काय म्हणाले, हे मला ठाऊक नाही, पण सर्वांनी बोलताना योग्य भाषेचा वापर करावा, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले.

सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावर टीका करताना सरकार मसनात जाईल असे म्हटले आहे, यावर प्रश्न विचारला असता, राज्यात असा कायदा आहे की, मुख्यमंत्री किंवा सत्तारुढ पक्षाविरुद्ध एक अक्षर जरी बोललं तर तुम्हाला किमान ५-१० ठिकाणी तक्रारी होऊन त्याला जेलमध्ये जावे लागते. पण, देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध कुणी बोलले तर त्याचा सन्मान होतो, ही आता महाराष्ट्राची परंपरा होत चालली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा