शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

Nagpur: अमृत काळात देशाच्या विकासासाठी युवकांची भूमिका मोलाची, देवेंद्र फडणवीस य़ांचं विधान

By कमलेश वानखेडे | Published: January 20, 2024 6:08 PM

Devendra Fadnavis News: आपला देश हा आता अमृत काळातून जात आहे. २०३५ पर्यंत देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. हा काळ हा देशाची दिशा ठरविणारा असेल. त्यामुळे अमृत काळात देशाच्या विकासात युवकांची भूमिका मोलाची राहणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

- कमलेश वानखेडे 

नागपूर  - आपला देश हा आता अमृत काळातून जात आहे. २०३५ पर्यंत देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. हा काळ हा देशाची दिशा ठरविणारा असेल. त्यामुळे अमृत काळात देशाच्या विकासात युवकांची भूमिका मोलाची राहणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे शनिवारी ‘मनी बी इन्स्टिट्यूट’मार्फत अमृत काळ आणि गुंतवणुकीवर आधारित चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमाला पहिल्या समारोपीय सत्रात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले. यावेळी मनी बी इन्स्टिट्यूटच्या संयोजक शिवानी दाणी-वखरे, आशुतोष वखरे, स्टॉक मार्केट तज्ञ एस. पी. तुलसीयन, विजय केडिया, अभिमन्यू तुलसियन उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढील पाच वर्षात भारताला पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत आणण्याचे स्वप्न पाहिले आहे. विकसित देशाकडे भारताची वाटचाल सुरू आहे. जगाला भारताकडे पाहून मार्केट समजाऊन घ्यावे लागेल. इथे १४० कोटी खरेदीदार आणि व्यवहार देखील आहे. ११ व्या क्रमांकावरून देशाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर आली आहे. लवकरच ती तिस-या क्रमांकावर आणण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान तसेच कालानुरूप अर्थसाक्षर होण्याची गरज आहे.

अर्थव्यवस्थेचा विस्तार देशातील १०० पूंजीपती करू शकतात. पण ते सर्वांगीण विकास करू शकत नाही.व्यक्तीच्या विकासातून जीडीपीचा विकास करणे हा पंतप्रधान मोदी यांचा फार्म्युला आहे. ११ कोटी शौचालय, ५ कोटी लोकांना घर मिळाल्याने त्यासंबंधी क्षेत्र विकसित होतेय त्यातून रोजगार निर्मित होते. २५ कोटी लोक देशातून गरिबीतून मोदींनी बाहेर आणले. तंत्रज्ञानाचा वापर करून हा विकास शक्य झाला, असेही त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गासाठी ५० हजार कोटींचे ऑफरउपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी समृध्दी महामार्ग तयार करत असताना माझ्या वर टीका केली जायची. या रोड ची आवश्यकता आहे का, असे प्रश्न विचारायचे. पण आज या महामार्गाचे ५० किमीचे काम बाकी असतानाही माझ्याकडे ५० हजार कोटींचे ऑफर आले आहेत. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर ही ऑफर ७० हजार कोटींपर्यंत जाईल, असेही त्यांनी सांगितले.

निवृत्ती नंतर सरकारच्या भरोश्यावर राहता येणार नाहीखासगी क्षेत्रात पेन्शन ची कन्सेप्ट नाही. त्यामुळे त्याचे नियोजन करताना आजच स्मार्ट नियोजन करावे लागेल. निवृत्ती नंतर सरकारच्या भरोश्यावर राहता येणार नाही. निवृत्ती नंतर आवश्यक पैसा कसा येईल याचे नियोजन आताच करावे लागेल, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर