शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘दिग्विजय’ दिवसाकडे अनेक महाविद्यालयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:57 IST

शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला ११ सप्टेंबर रोजी सव्वाशे वर्षे पूर्ण झाली. या ‘दिग्विजय’ दिवसाकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे निर्देश असतानादेखील अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. स्वामी विवेकानंदांच्या त्या भाषणाचे वाचन करण्यासाठी वेळ काढण्याची तसदीदेखील महाविद्यालयांनी घेतली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचे वाचन करण्यासाठी पुढाकारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला ११ सप्टेंबर रोजी सव्वाशे वर्षे पूर्ण झाली. या ‘दिग्विजय’ दिवसाकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे निर्देश असतानादेखील अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. स्वामी विवेकानंदांच्या त्या भाषणाचे वाचन करण्यासाठी वेळ काढण्याची तसदीदेखील महाविद्यालयांनी घेतली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे भाषण केले होते व भारताची ख्याती जगभरात गेली होती. या भाषणाला सव्वाशे वर्षे होत असल्यामुळे देशभरातील अनेक ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद हे युवावर्गाचे आदर्श आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठातदेखील हा दिवस साजरा व्हायला पाहिजे, असा प्रस्ताव डॉ. निरंजन देशकर यांनी व्यवस्थापन परिषदेसमोर मांडला. या प्रस्तावाला सदस्यांनी अनुमोदन दिले व व्यवस्थापन परिषदेने हा प्रस्ताव संमत केला.त्यानुसार विद्यापीठाने २ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी केले व हा दिवस नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग, संचालित महाविद्यालये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचे निर्देश दिले. महाविद्यालयांना विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिलीप कावडकर यांनी पत्रदेखील पाठविले. यादिवशी विवेकानंद यांच्या त्या भाषणाचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाचन करण्याचे निर्देश देण्यात आले.मंगळवारी काही महाविद्यालयांनी यासंदर्भात तयारी केली होती व वेळापत्रकानुसार विद्यार्थी, शिक्षकांच्या उपस्थितीत त्या ऐतिहासिक भाषणाचे वाचनदेखील झाले. मात्र अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या निर्देशाकडे चक्क पाठच फिरविली. कुठल्याही प्रकारे भाषणाचे वाचन झाले नाही व याबाबत शिक्षक, विद्यार्थ्यांना कल्पनादेखील देण्यात आली नव्हती. विद्यापीठाच्या काही विभागांमध्येदेखील अशीच स्थिती होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.वर्ग झाले, वाचन नाहीकाही महाविद्यालयांत स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचे नावापुरते वाचन झाले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित असताना त्यांना वर्गातून बोलविण्याची तसदी न घेता केवळ काही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भाषणाची औपचारिकता आटोपण्यात आली.कारवाई काय करणार ?परिपत्रकानुसार विद्यापीठातील सर्व विभाग व महाविद्यालयात ‘दिग्विजय दिवस’ साजरा करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले होते. या आयोजनाचा अहवाल विभाग व महाविद्यालयांना छायाचित्रांसह विद्यार्थी विकास विभागाच्या संचालकांकडे पाठवायचा आहे, असे स्पष्ट केले होते. याबाबत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप कावडकर यांच्याशी संपर्क केला असता काही महाविद्यालये व विभागांचेच अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व महाविद्यालयांना १२ सप्टेंबरपर्यंत अहवाल पाठवायचे आहे. जी महाविद्यालये अहवाल पाठविणार नाहीत, त्यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावू असे त्यांनी सांगितले. मात्र कुठली ठोस कारवाई होईल का याबाबत त्यांनी सध्या सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

 

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ