शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

शाेषखड्ड्यातून सांडपाण्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:07 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : गावकऱ्यांचे सुदृढ आराेग्य राखायचे असेल तर गावातील सांडपाण्याचे याेग्य नियाेजन करणे गरजेचे आहे. याकरिता ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : गावकऱ्यांचे सुदृढ आराेग्य राखायचे असेल तर गावातील सांडपाण्याचे याेग्य नियाेजन करणे गरजेचे आहे. याकरिता शाेषखड्ड्यांच्या माध्यमातून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा स्तुत्य उपक्रम घोराड ग्रामपंचायतने सुरू केला असून, आतापर्यंत गावात सार्वजनिक १४ तर ४० वैयक्तिक शोषखड्डे तयार करण्यात आले आहे.

घरासभाेवताल, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. त्याचा घाण वास येतो. या पाण्याने रस्त्यावर चिखल हाेऊन घसरण निर्माण होते. शिवाय, डासांना अंडी घालायला जागा मिळून त्यांची पैदास वाढते. डासांमुळे मलेरियासारखे आजार होतात. त्यामुळे सांडपाण्याची याेग्य विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरविण्यासाठी शोषखड्डा महत्त्वपूर्ण ठरतो.

सध्या सांडपाण्याची विल्हेवाट नालीच्या माध्यमातून होत असते. परंतु नाली बांधकाम केल्यानंतर जर ती तुंबली तर उपसा करायला ग्रामपंचायतकडे पैसे नसताे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाली बांधकाम होऊ शकत नाही. नाली आणि सिमेंट रोडमुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. नुसते पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत शोषखड्डे हे जमिनीत पाणी मुरविण्याचे उत्तम माध्यम आहे. प्रत्येक ग्रामपंचायतने असे उपक्रम घेणे गरजेचे झाले आहे.

घरातील सांडपाणी मुद्दाम तयार केलेल्या शोषखड्ड्यात सोडल्याने ते जमिनीत मुरते. आंघोळीच्या मोरीतील, धुण्याभांडीच्या पाण्याचीही विल्हेवाट शोषखड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळू असलेल्या, मुरमाड जमिनीत या पाण्याचा चांगला निचरा होतो. पण चिकणमाती असलेल्या जमिनीत मात्र याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी चर खणून पाण्याला दूर न्यावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यास आळा बसतो व त्यापासून रोगराई टाळण्यास मदत होते. त्यामुळे शोषखड्डे तयार करणे उपयोगाचे ठरते, असे सरपंच मंगेश गोतमारे यांनी सांगितले.

...

शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो. डासांपासून मलेरियासारखे पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.

- महेश्वर डोंगरे, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती, कळमेश्वर

...

सध्या शासनातर्फे जलशक्ती अभियान सुरू आहे. या माध्यमातून प्रत्येक कुटुंबामागे एक शोषखड्डा आणि प्रत्येक घरी छतावरील पाणी जमिनीत मुरविण्याचे काम केल्यास खऱ्या अर्थाने पाणी जमिनीत मुरू शकते आणि पाण्याची पातळीसुद्धा वाढू शकते. म्हणजेच सद्यस्थितीत जमिनीतील पाण्याचा उपसा जास्त प्रमाणात असल्याने भूजल पातळी कमी होत आहे. त्यावर हा शोषखड्ड्याचा सर्वात रामबाण उपाय होऊ शकतो.

- संदीप गाेडशलवार, खंडविकास अधिकारी (मनरेगा), जि. प. नागपूर