शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपूर मनपाच्या १५७ सफाई कामगारांना स्थायी नियुक्ती आदेशाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:45 IST

नागपूर महापालिकेमधील १५७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत स्थायी नियुक्ती आदेशाचे तसेच महापालिकेत काम करताना मृत पावलेल्या व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे कार्ड उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अभिजित बांगर हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देलाड पागे समिती शिफारशींची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेमधील १५७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत स्थायी नियुक्ती आदेशाचे तसेच महापालिकेत काम करताना मृत पावलेल्या व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे कार्ड उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अभिजित बांगर हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले.मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्या हस्तलकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, एसबीएम विकास कौन्सिलचे अध्यक्ष सतीश सिरसवान, आरोग्य विभागाचे किशोर मोटघरे, राजेश लवारे, विशाल मेहता उपस्थित होते.सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती देणे व जमादारांच्या वारसांना नियुक्ती कार्ड मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे कार्य केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करून सर्व समस्या मार्गी लावल्या. त्यामुळे आज १५७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश मिळत आहेत. मात्र या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांनी पुढाकार घेतला असला तरी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान असल्याचे संदीप जोशी म्हणाले.सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर माजी महापौर प्रवीण दटके व तत्कालीन सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. मलवाहक जमादारांच्या नेत्यांकडूनही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे या समस्या तातडीने मार्गी लावता आल्या, असेही सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.नागपूर शहर स्वच्छ, सुंदर होत आहे. शहराला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यात सफाई कर्मचाºयांचे महत्त्वाचे योगदान आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर राहावे यासाठी शहरातील घाण साफ करण्याचे मौलिक कार्य हे सफाई कर्मचारी करतात. असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी यावेळी केले.सर्व ऐवजदार, सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक आयोजित केली. यामध्ये सर्व ऐवजदारांना मनपामध्ये स्थायी नोकरी देणे व ऐवजदारांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करून त्यांना नोकरी देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व ऐवजदारांना लाड-पागे समितीच्या शिफारशींतर्गत मनपामध्ये स्थायी नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता.अनेक वर्षापासून प्रशासनाकडूनही न सुटू शकलेले हे प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष पुढाकार घेत सर्व प्रशासकीय अडथळ्यांचा अभ्यास करून सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे महत्त्वाचे कार्य केले. या कार्यामध्ये अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख यांचीही मौलिक भूमिका आहे.वारसांना नियुक्तीचे कार्ड प्रदाननागपूर महापालिकेमध्ये काम करताना मृत पावलेले व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या तीन वारसांना नियुक्तीचे कार्ड यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये सौम्य कन्हैया बिरहा, मंजू दर्पण खरे व जितेंद्र भीमराव टेंभरे यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीचे कार्ड देण्यात आले. इतरांना कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी