शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

बांधकामाच्या आवाजाने झोप येईना

By admin | Published: October 31, 2015 3:13 AM

रामदासपेठ, धंतोली, सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, सदर, जयताळा इत्यादी भागात अनेक रहिवासी प्रकल्प उभारले जात आहेत.

नागरिकांनी लिहिले हायकोर्टाला पत्र : शहरात उभारले जाताहेत अनेक रहिवासी प्रकल्पनागपूर : रामदासपेठ, धंतोली, सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, सदर, जयताळा इत्यादी भागात अनेक रहिवासी प्रकल्प उभारले जात आहेत. दिवसातील काही तास सोडल्यास सतत बांधकाम सुरू असते. बांधकाम यंत्रे व तोडफोडीचा त्रासदायक आवाज परिसरात घुमत असतो. यामुळे परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे. काही नागरिकांनी याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पत्र लिहिले आहे. यावरून न्यायालयाने जनहित याचिका दाखल केली आहे.पत्रातील माहितीनुसार, पीडित नागरिक संबंधित भागात गेल्या २५ वर्षांपासून राहात आहेत. त्यांच्या कुटुंबात अगदी लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. वृद्ध व्यक्तींना विविध गंभीर आजार असून त्यांना योग्य वैद्यकीय उपचारासह आरामाचीही गरज आहे. वैद्यकीय संशोधनानुसार लहान मुले व वृद्ध नागरिकांना पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. शांत झोप न मिळाल्यास त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. रक्तदाब, हृदयरोग इत्यादी घातक आजार जडू शकतात. शांत झोप घेणे प्रत्येक नागरिकांचा महत्त्वपूर्ण अधिकार आहे. त्यात बाधा आणणे राज्यघटनेतील आर्टिकल २१ अंतर्गत देण्यात आलेल्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन ठरते. परंतु, रहिवासी प्रकल्पांतील बांधकामाच्या आवाजामुळे नागरिकांचा शांत झोप घेण्याचा अधिकार हिरावला जात आहे. बिल्डर्स व ठेकेदार बांधकामासाठी कोणतीही निश्चित वेळ पाळत नाही. रात्री १० वाजतानंतरही बांधकाम सुरू ठेवले जाते. तसेच, सकाळी ५ वाजतापासून बांधकामाला सुरुवात केली जाते. परिसरातील नागरिकांना शांत झोप घेता यावी याकरिता रात्री १० ते सकाळी ८ वाजतापर्यंत बांधकाम बंद ठेवणे आवश्यक आहे. यासंदर्भात संबंधित बिल्डर्स व ठेकेदारांना विनंतीपत्र देण्यात आले होते. परंतु, त्यांनी काहीच दखल घेतली नाही. (प्रतिनिधी)