शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
3
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
4
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
5
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
6
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
7
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
8
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
9
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
10
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
11
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
12
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
13
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
14
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...
15
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
16
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
17
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
18
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
19
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
20
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला

सत्तेची गुर्मी येऊ देऊ नको

By admin | Published: May 17, 2017 2:27 AM

ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मते दिली, सत्तेवर बसविले, त्यांना तुम्ही लाथा, शिव्या देत आहात. लक्षात घ्या,

साहित्यिक, समाजसेवक, चळवळीतील कार्यकर्त्यांचा सरकारला सल्ला : शेतकरी अपमान निषेध सभा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मते दिली, सत्तेवर बसविले, त्यांना तुम्ही लाथा, शिव्या देत आहात. लक्षात घ्या, सत्तेचा माज चढू देऊ नका, नाहीतर पायउतार व्हायला वेळ लागणार नाही, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी दिला. दक्षिणायनतर्फे संविधान चौकात शेतकरी अपमान निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीवरून शेतकऱ्यांना ‘साले’ असा शब्दप्रयोग केला. देशाच्या पोशिंदाच्या बाबतीत असा शब्दप्रयोग करणे म्हणजे त्याचा अपमान करणे होय. दानवेंनी केलेल्या शेतकऱ्यांच्या अपमानाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी नेते विजय जावंधिया, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे, निवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, प्राचार्य बबनराव तायवाडे, अमिताभ पावडे, डॉ. प्रकाश तोवर, शरद निंबाळकर, रणजित मेश्राम, प्रा. प्रमोद मुनघाटे, नरेंद्र पलांदूरकर, हरीश धुरट, सुनिती देव, रमेश बोरकुटे, प्रभू राजगडकर, प्रभाकर कोन्डबत्तूनवार, बबन नाखले, डॉ. यशोदीप केदार, कौशिक वासनिक, सुजित जाधव, संजिवनी पावडे, सुभाष तुलसीता, स्नेहल वाघमारे, सुजित जाधव, मारोती वानखेडे, नितीन रोंघे, अरुण मोरघडे, संगीता महाजन, तन्हा नागपुरी, धरम पाटील, राजश्री पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या अपमान केल्याबद्दल शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना विजय जावंधिया म्हणाले की, सरकारने तूर विकत घेतली म्हणून काही उपकार केले नाही. सत्तेचा माज आल्यासारखे वागू नका, सावध व्हा, असा इशारा दिला. एकूणच शेतकऱ्यांची अवस्था व शेतकऱ्यांच्या धोरणावर अमिताभ पावडे म्हणाले की, घरची करते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा असे सरकारचे झाले आहे. लीलाताई चितळे म्हणाल्या की अन्नदाता आत्महत्या करतो आहे, अशावेळी त्यांची परिस्थिती सुधारायला हवी. पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावे, परदेशी दौरे थांबावावे. शेतकऱ्यांचा अपमान होईल, असे वक्तव्य करू नका, हा प्रकार ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आहे. शरद निंबाळकर म्हणाले की दानवेच्या रूपात सरकारचा हा उन्माद बोलतोय. बबनराव तायवाडे म्हणाले की शेतकऱ्यांबद्दल असे अपशब्द भाजपाच्या संस्कृतीला शोभत नाही. हरिभाऊ केदार यांनी या सभेला शोकसभा संबोधून, दानवेच्या मगरुरीचा निषेध केला. दानवेंचे उद्गार शेतकऱ्यांबरोबर कामगार व मजूरांच्या विरोधात आहे. तन्हा नागपुरी यांनी सत्ता की नशे में, भाजपा अपनी हालात भूल चूकी है... असा टोमणा हाणला. सभेचे संचालन अरुणा सबाने यांनी केले.