शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

संमेलनाच्या आवश्यक खर्चाला उधळपट्टी संबोधू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:41 AM

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चावरून सध्या रणकंदन माजले आहे. शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने संमेलनावर शृंगारीक उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मराठी अस्मितेशी जुळलेले साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडावे यासाठी केलेल्या आवश्यक खर्चाला उधळपट्टी संबोधणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. उपाशी लेकरांबाबत सर्व सारखेच संवेदनशील असून यवतमाळ येथील संमेलन साधेपणानेच केले जात आहे. मात्र माहिती न घेता अवांछित आरोप करून संस्थेची जाणिवपूर्वक बदनामी करण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

ठळक मुद्देश्रीपाद जोशी यांचे उत्तर : संस्थेबाबत जाणिवपूर्वक बदनामीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चावरून सध्या रणकंदन माजले आहे. शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने संमेलनावर शृंगारीक उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मराठी अस्मितेशी जुळलेले साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडावे यासाठी केलेल्या आवश्यक खर्चाला उधळपट्टी संबोधणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. उपाशी लेकरांबाबत सर्व सारखेच संवेदनशील असून यवतमाळ येथील संमेलन साधेपणानेच केले जात आहे. मात्र माहिती न घेता अवांछित आरोप करून संस्थेची जाणिवपूर्वक बदनामी करण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली.संमेलनात अनावश्यक राजकारण्यांचा भरणा नसावा, कोणताही बडेजाव नसावा, संमेलन हे ऐश्वर्याचे, संपत्तीचे, प्रदर्शन करण्यासाठी नसावे व ते वाङ्मयीन दर्जा, गुणवत्ता यावर भर देत साधेपणाने व्हावे या सूचना महामंडळाने या कार्यकाळात आधीच आयोजकांना दिलेल्या आहेत व त्यांचे पालन या अगोदरच्या आयोजकांनी केले तसेच यवतमाळचेही आयोजक करीत असल्याची स्पष्टोक्ती डॉ. जोशी यांनी केली. आपली व्यथा जरूर आणि ठामपणे मांडलीच पाहिजे, पण त्यासाठी महामंडळावर पारंपरिक पद्धतीने , मुळात माहिती न घेता शृंगारासारखे अनिष्ट व तथ्यहीन आरोप करण्यात अर्थ नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. संमेलनात महिला देखील असतात याचे भानही बाळगले जावे. बाकीचे असंवेदनशील आहेत असे गृहीत धरूनच आरोप करणे व्यापक हिताचे नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.कोणताही खर्च अवाढव्य नसून जो एवढ्या मोठ्या आयोजनासाठी आवश्यक आहे तितकाच किमान खर्च आयोजक करीत आहेत. ती शेतकरी कुटुंबातीलच मंडळी व यवतमाळ जिल्ह्यातीलच आहेत. जिल्ह्यातील इतरांप्रमाणेच ती देखील स्थानिक समस्यांबाबत तेवढीच संवेदनशील आहेत. साहित्यिकांनी मानधन, प्रवासखर्च घ्यायचा की त्यागायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. महामंडळ ते लादू शकत नाही. संमेलन आयोजकांकडून येणारे पैसे महामंडळाच्या खात्यात जमा होत नसतात. ते संमेलन निधीच्या स्वतंत्र खात्यात जमा होतात ते महामंडळाचे नसतात. तो स्वतंत्र व कायम निधी असून त्यातून कोणताच खर्च होत नसतो. ही माहिती करून न घेता आकारण आरोपबाजी करणे अर्थहीन व बेजबाबदारपणा दर्शविणारी असल्याची टीका डॉ. जोशी यांनी केली.धनदांडग्यांनी चालविलेल्या अब्जावधींच्या बडेजावाला खासगी म्हणून समर्थन करणे म्हणजे संपत्तीच्या विषम वाटणीचे समर्थन करणे ठरत असल्याचे सांगत विशिष्ट व्यक्ती व संस्थेबद्दल आकस बाळगून हा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली.महामंडळ अध्यक्ष बेभान : देवानंद पवारसाहित्य संमेलनावर अवास्तव उधळपट्टी होत असल्याचा आरोप करणारे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी डॉ. श्रीपाद जोशी यांच्या उत्तरावर प्रत्युत्तर देत महामंडळ अध्यक्ष बेभान झाल्याची टीका केली आहे. शृंगार हा शब्द संमेलनासाठी उभारण्यात येणारा अवाढव्य सभामंडप व त्याच्या सजावटीवर, स्वागत कमानी, मोठमोठ्या हॉटेलमध्ये महागडी निवास व्यवस्था, हारतुरे आणि भोजनावळीसाठी अभिप्रेत होता. मात्र या शब्दाचा महिलांशी संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न एका ज्येष्ठ साहित्यिकाकडून होत असल्याबद्दल पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. अवाढव्य खर्चाला अत्यावश्यक खर्च ठरवतांना साहित्य महामंडळ अध्यक्षांनी नेमके कोणते निकष लावले, असा सवाल त्यांनी केला. इच्छा व प्रामाणिक हेतू असेल तर कार्यक्रमाचा खर्च नक्कीच कमी करता येतो. केवळ खर्च कमी करण्याच्या सूचना देऊन जबाबदारी झटकून ते करता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली. कुणाबद्दलही आकस न ठेवता शेतकरी हितासाठीच या मुद्याला हात घातला असून त्याला अविवेकी म्हणणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. संमेलनातून स्थानिक वस्तू व सेवा पुरविणाऱ्यांना थोडा लाभ होत असला तरी त्यांची उपजीविका संमेलनावर अवलंबून नाही. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे कमीत कमी खर्च करण्याचा व वाचलेला खर्च शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्याच्या सूचना आयोजकांना देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ