शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

दलित किंवा नवबौद्ध वापरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 1:25 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बौद्ध म्हणूनच ओळख प्रस्थापित करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका. बौद्ध म्हणणूनच स्वत:ची ओळख प्रस्थापित करा. तसेच सरकारने सुद्धा दलित-नवबौद्ध याचा वापर करू नये, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)चे कार्यकारी अध्यक्ष राजरत्न अशोक आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राजरत्न आंबेडकर म्हणाले, जनगणनेनुसार देशात बौद्धांची लोकसंख्या ८४ लाख इतकी सांगितली जात आहे. ती चुकीची आहे. ही संख्या कितीतरी अधिक आहे. यासाठी आपण स्वत: बौद्धांची जनगणना करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात तफावत आढळून आल्यास न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल सुरू असून देशभरात शाळा कॉलेज उभारण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.संस्था सर्व न्यायालयीन लढाईतून मुक्त२१ जून २०१३ रोजी न्यायालयाने अशोक आंबेडकर यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालानंतर संस्थेवरील मीराताई आंबेडकर यांचा दावा फेटाळण्यात आला असून बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया ही सर्व न्यायालयीन लढाईतून मुक्त झाली आहे, असा दावाही राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी केला.ज्योतीकर हे विहिंपचे कार्यकर्तेसंस्थेचे विश्वस्त पी.जी. ज्योतीकर हे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त असलेला व्यक्ती अगदी विरोधाभासी असलेल्या संस्थेत कसे काय काम करू शकतो. त्यांनी चंद्रबोधी पाटील यांच्या माध्यमातून बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाला भाजपा व विहिंपच्य दावनीला बांधण्याचे काम केले आहे. त्यामुळे ज्योतीकर यांना विश्वस्त पदावरून काढण्यासाठी न्यायालयीन कारवाई केली जात असल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.प्रकाश आंबेडकरांनी केले संस्थेच्या घटनेचे उल्लंघनप्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच पुण्यातील दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला भेट दिली. त्यांची ही भेट राजकीय नेता म्हणून योग्य असली तरी भारतीय बौद्ध महासभेच्या नियमाचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे त्यांना या उल्लंघनाबद्दल संस्थेचे सदस्य होता येणार नसल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.