शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल नको : सरसंघचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 11:24 AM

कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देजगाला समजेल त्याच भाषेत आपले महत्व समजवावे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जगातील आर्थिक उतारचढाव फारसे परिणाम करू शकत नाही, असे आपले अर्थकारण राहिले आहे. सहकार व लहान उद्योगांमुळेच हे शक्य झाले आहे. देशाची आर्थिक व्यवस्था आणखी मजबूत होणे गरजेचे आहे. परंतु अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल करून काहीही फायदा होणार नाही. कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

एकेकाळी ‘इम्पोर्टेड’ वस्तूंचे महत्त्व होते. आता निर्यातीचे महत्त्व वाढले आहे. देशाचे आर्थिक बळ निर्माण झाले पाहिजे. हे समाजातील उद्योजकतेतूनच शक्य आहे. भारताला जगाला आपले ‘मार्केट’ बनवायचे नाही, तर एक कुटुंब बनवायचे आहे. तरीदेखील आपल्या उत्पादनांचे महत्त्व जगाला जी भाषा समजेल त्याच भाषेत समजवावे लागेल. गुणवत्तेसोबतच मार्केटिंगलादेखील महत्त्व आले असून, चांगल्या उत्पादनांचे ब्रॅण्ड बनायला हवे, असे सरसंघचालक म्हणाले.

छोट्या उद्योगांना बळकटी मिळावी

सहकारितेच्या मागे गुणवत्ता आवश्यक असते. त्यात स्वार्थाला जागा नसते. मात्र सहकारात स्वार्थ आला तर त्याचा स्वाहाकार होतो. सद्य:स्थितीत देशातील छोटे उद्योग व कारागीर यांना बळकटी मिळाली पाहिजे. सहकाराचे काम व्यवसाय करणे नव्हे तर देशाची उभारणी करण्याचे आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात मूठभर लोकांचेच खिसे भरत नाहीत

जगातील देश व्यापाराला नफ्याचे साधन मानतात. परदेशातील व्यापार, उद्योगात काही लोक कंपन्यांचे मालक असतात आणि इतर लोक त्या कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्या व्यवसायातून होणारा लाभ मूठभर लोकांच्या खिशात जातो. परंतु, भारतात असे अजिबात नाही. या भावनांमुळे येथे व्यापारधर्म हा शब्द रूढ झाला आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMohan Bhagwatमोहन भागवतEconomyअर्थव्यवस्था