शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आंबा बाजारात पण दुप्पट भाव; गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के कमी आवक

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 9, 2024 15:32 IST

विदर्भात आंध्रप्रदेशच्या बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक आवक होते. पण यंदा उशीर झाला आहे

नागपूर : उन्हाळा आणि आंब्याचा रस हे समीकरण आहे. पिकलेले आंब्याने जिभेला पाणी सुटले नाही तर नवलच. मात्र, सध्या आंब्याच्या रसावर ताव मारणाऱ्यांना यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विदर्भात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे. 

शेजारच्या राज्यातून मुख्यत्त्वे अनंतपूर जिल्ह्यातून (आंध्रप्रदेश) येणाऱ्या आंब्यांची आवकही कमी आहे. सुरुवातीला डिसेंबर महिन्यात कळमना फ्रूट बाजारात बैंगनपल्लीचे भाव १५० रुपयांवर गेले होते. सध्या दररोज बैंगनपल्ली आंब्याच्या दीड ते २ हजार क्रेट (एक क्रेट २० किलो) विक्रीसाठी येत असून भाव दर्जानुसार प्रतिकिलो ७० ते १०० रुपयांपर्यंत उतरले आहेत. सध्या केवळ बैंगनपल्ली आंब्याची आवक आहे. दरवाढीमुळे बाजारात दाखल झालेला आंबा खाण्यास परवडणारा नाही.

कळमना फ्रूट अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, आंध्रप्रदेशात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाअभावी आंब्याचे उत्पादन २० ते २५ टक्के कमी राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेली आवक मेपर्यंत राहील. सध्या सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी आंब्याची आवक आहे. सध्या कळमन्यात भाव ७० ते १०० रुपये किलो असून किरकोळमध्ये दुप्पट भावात विक्री होत आहे. बैंगनपल्ली आंबा कळमन्यातून मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात विक्रीसाठी जात आहे.किरकोळमध्ये १५० ते १८० रुपये किलोयंदाच्या मोसमात केवळ आंध्रप्रदेशचा बैंगनपल्ली आंबा कळमन्यात विक्रीसाठी आला आहे. घाऊक बाजारात भाव ७० ते १०० रुपये किलो आहेत. किरकोळमध्ये दुप्पट भावात खरेदी करावा लागत आहे. आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील. दोन वर्षांआधी हंगामाअखेरीस किरकोळमध्ये बैंगनपल्लीचे भाव ४० ते ५० रुपये किलोपर्यंत कमी झाले होते. कोकणचा हापूस आणि विदर्भातील गावरानी आंबा येण्यास उशीर आहे.

वारा, अवकाळी पावसाने नुकसानविदर्भात नागपूर जिल्हा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ बुलढाणा, भंडारा, गोंदिया या भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाला. काही ठिकाणी तर झाडाला लागलेल्या कैऱ्याही पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे.

भाव कमी कधी होणार?विदर्भात आंध्रप्रदेशच्या बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक आवक होते. पण यंदा उशीर झाला आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबर अखेरपासून मे महिन्यापर्यंत असतो. किरकोळमध्ये भाव १५० ते १८० रुपये किलो आहेत. दोन वर्षांआधी हंगामाअखेर भाव ४० ते ५० रुपयांवर आले होते. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याचे भाव कमी होतील.कोकणातून आंबा येण्यास उशीरआंध्रप्रदेशातून येणारे बैगनफल्ली, तोताफल्ली आणि निलम आंब्यांची आवकही गेल्या काही वर्षांपासून कमी होत आहे. नैसर्गिक संकटांचा आंब्याला फटका बसला आहे. रसाचे आंबेही महागले आहेत. सध्या कळमना बाजारात केवळ बैंगनपल्ली आंब्याची आवक आहे. कोकणातून हापूस आंबा येण्यास एक महिन्याचा कालावधी आहे.

यावर्षी विदर्भासह अनेक राज्यात गारपीटीमुळे आंब्याचा बार झडला आहे. त्यामुळे यंदा २० ते २५ टक्के आवक कमी राहील. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमीच आहे. सध्या आंध्रप्रदेशातून बैंगनपल्ली आंब्याची आवक सुरू आहे. पुढील महिन्यात सर्वच प्रकारचे आंबे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. - आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फ्रूट अडतिया असोसिएशन.

टॅग्स :Mangoआंबा