शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

‘नीट’च्या भरघाेष निकालावर संशयाचे सावट, गैरप्रकाराचा आराेप

By निशांत वानखेडे | Published: June 06, 2024 5:53 PM

७१८, ७१९ गुण मिळणे अशक्य असल्याचा दावा : पहिल्या रॅंकवर ६७ विद्यार्थी असण्यावरही आक्षेप

निशांत वानखेडे

नागपूर : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी नॅशनल टेस्टींग एजेन्सीतर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचा यंदा भरघाेष निकाल लागला आहे. मात्र या भरघाेष निकालावरच संशयाचे सावट पसरले आहे. एकतर यावर्षी ६७ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ७२० गुण मिळवून पहिली रॅंक प्राप्त केली, जे यापूर्वी कधीही झाले नाही. दुसरे म्हणजे परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगमुळे ७१८ किंवा ७१९ गुण मिळणे अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

एनटीए’ने १४ जूनला नीटचा निकाल लावण्याची घाेषणा केली हाेती, मात्र त्याच्या १० दिवसांपूर्वी ४ जून राेजी ऐन लाेकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी अचानक नीटचा निकाल जाहीर केला. परीक्षेत झालेल्या अनियमिततेकडून लाेकांचे लक्ष भटकविण्यासाठीच हा प्रकार केल्याचा आराेप हाेत आहे. ५ मे राेजी ही परीक्षा झाली हाेती व त्यावेळी बिहारमध्ये पेपर लिक झाल्याच्या बातम्या चर्चेत हाेत्या. विद्यार्थ्यांनी एनसीईआरटीच्या जुन्या पुस्तकातून अभ्यास चालविला हाेता आणि ऐन ऑक्टाेबर-नाेव्हेंबरमध्ये पुस्तका बदलण्याची घाेषणा करण्यात आली. आता निकाल जाहीर झाल्यानंतर निकालातही घाेळ केल्याचा आराेप हाेत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिली रॅंक, मिळालेले गुण, वगळलेल्या अभ्यासक्रमातून विचारलेले प्रश्न अशा अनेक आक्षेपांना समाेरे जावे लागत असून ‘एनटीए’ने नीट परीक्षेचा स्तरच घसरविला, असा माेठा आराेप हाेत आहे.

हे आहेत आक्षेप

- तिन्ही विषय मिळून ७२० गुणांचा पेपर. एका प्रश्नाला चार गुण आहेत. निगेटिव्ह मार्किंगमुळे उत्तर चुकले तर एक गुण वजा हाेताे. यानुसार एखाद्याने सर्व प्रश्न याेग्य साेडविले तर ७२० गुण मिळतील. मात्र एक प्रश्न साेडला तर ७१६ किंवा उत्तर चुकले तर ७१५ गुण मिळतील. मग अनेक विद्यार्थ्यांना ७१९, ७१८ गुण कसे मिळाले, हा प्रश्न आहे.- ‘एनटीए’ने परीक्षेदरम्यान नियाेजनाअभावी विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेल्याने त्यांना अतिरिक्त गुण दिल्यामुळे ७१९, ७१८ गुण मिळाल्याची सफाई दिली. मात्र ७०० पेक्षा अधिक गुण घेणाऱ्यांना ग्रेस मार्क देण्यात अर्थ काय, असा सवाल केला जात आहे. एवढ्या माेठ्या परीक्षेत गाेंधळ हाेताे कसा?

- परीक्षेत एका केंद्रावर जवळपासचे बैठक क्रमांक असलेल्या आठ विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले आहेत. असे एकसारखे गुण मिळाले कसे, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

कट ऑफ ३० गुणांनी वाढेलया निकालामुळे विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल. गेल्या वर्षी सरकारी मेडिकल काॅलेजचा कट ऑफ ५८७ गुणांवर हाेता. यंदा ६३० च्या खाली गुण असलेल्यांना शासकीय महाविद्यालय मिळणे अशक्य वाटते आहे. ७२० च्या खालील विद्यार्थ्यांना एम्स दिल्लीचा प्रवेश शक्यच नाही. सुदैवाने महाराष्ट्रात ३८ मेडिकल काॅलेज व ५१०० जागा आहेत. त्यामुळे येथे नुकसान कमी हाेईल. तसे महाराष्ट्रात ग्रेस गुण एकाही विद्यार्थ्याला मिळाले नाहीत.

- आर्यन नायडू, समुपदेशक, मेडिकल अभ्यासक्रम

एनटीएने नीटचा स्तर घटविलानीटची परीक्षा आणि लागलेला संभ्रमित निकाल पाहता काहीतरी गडबड झाली, हे निश्चित आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणात विद्यार्थी पहिल्या रॅंकमध्ये येणे, ७१९, ७१८ गुण मिळणे आश्चर्यकारक आहे. सीबीएसईद्वारे परीक्षा घेईपर्यंत सर्व व्यवस्थित हाेते. एनटीएने नीटचा स्तरच घसरविला आहे.

- डाॅ. समीर फाले, नीट मार्गदर्शक.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालfraudधोकेबाजीnagpurनागपूर