शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
3
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
4
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
5
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
6
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
7
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
8
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
9
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
10
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
11
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
12
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
13
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
14
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
15
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
16
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
17
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
18
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
19
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
20
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

तब्बल ६ ते ९ तास विलंबाने पोहचल्या डझनभर रेल्वेगाड्या; ज्येष्ठांचे अन् मुलांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2023 10:03 PM

Nagpur News रायपूर, छत्तीसगड क्षेत्रात सुरू असलेल्या रेल्वेच्या विकास कामांमुळे डझनभर रेल्वेगाड्या नागपुरात विलंबाने पोहचल्या. शनिवारी दिवसभर रेल्वेची ही लेटलतिफी सुरू होती.

नागपूर : रायपूर, छत्तीसगड क्षेत्रात सुरू असलेल्या रेल्वेच्या विकास कामांमुळे डझनभर रेल्वेगाड्या नागपुरात विलंबाने पोहचल्या. शनिवारी दिवसभर रेल्वेची ही लेटलतिफी सुरू होती. त्यामुळे संबंधित गाडीच्या प्रतिक्षेत प्रवाशांचे मोठे हाल झाले.

रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील रायपूर आणि आजुबाजुच्या रेल्वे मार्गावर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे या मार्गाने नागपूरकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्या तिकडे रेंगाळत आहेत. परिणामी नागपूरला आणि नागपूरच्या पुढे पोहचण्यास त्यांना विलंब होत आहे. आज शनिवारी ६ मे रोजी डझनभर रेल्वेगाड्या नागपूर स्थानकावर विलंबाने पोहचल्या. त्यामुळे संबंधित गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या शेकडो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. कोणती गाडी ६ तर कोणती ५ तास विलंबाने पोहचली. हावडा -सीएसटी मेल तर तब्बल ९ तास विलंबाने पोहचली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे खास करून मुले आणि ज्येष्ठांचे मोठे हाल झाले.

हावडा-मुंबई मेल ४ तास विलंब, हावडा-लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी एक्सप्रेस तास, हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस ३:५० तास, गीतांजली एक्सप्रेस ३ तास, शालीमार-पोरबंदर एक्सप्रेस ५: ३० तास, हावडा -पुणे आजाद हिंद एक्सप्रेस ४ तास, सीएसटी- हावडा गीतांजली एक्सप्रेस २ तास, अहमदाबाद- हावडा एक्सप्रेस ३ तास, पुरी साईनगर ४ तास, शालीमार-लोकमान्य टिळक समरसता एक्सप्रेस, गांधी-धामपुरी एक्सप्रेस २ तास, रायपुर-सिकंदराबाद एक्सप्रेस १ तास, हावडा -सीएसटी मेल ९ तास, कोरबा-अमृतसर एक्सप्रेस तास, हावडा -अहमदाबाद एक्सप्रेस ६ तास, हावडा -पुणे दुरंतो एक्सप्रेस ४ तास, विशाखापट्टनम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस २ तास, तिरूपती दानापूर एक्सप्रेस २ तास, हटिया लोकमान्य टिळक एक्सप्रेस ४ तास, अमृतसर बिलासपूर छत्तीसगड एक्सप्रेस ३ तास विलंबाने आज नागपूर स्थानकावर पोहचली.

हावडा लाईनच्या गाड्यांना जास्त विलंब

नागपूर मार्गे विविध ठिकाणी धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांना विलंब होत असला तरी त्यात हावडा लाईनच्या गाड्यांची संख्या जास्त आहे. रेल्वे सूत्रांच्या मते १० मे पर्यंत विकास कामे सुरू असल्याने तोपर्यंत प्रवाशांना असाच त्रास सहन करावा लागू शकतो.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे