शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
5
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
6
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
7
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
8
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
9
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
10
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
11
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
12
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
13
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
14
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
15
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
16
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
17
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
18
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
19
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?

महामानवाच्या वस्तूंना पुन्हा वाळवी लागण्याचा धोका; रासायनिक प्रक्रियेनंतरही ४०० वर वस्तू कुलूपबंदच

By आनंद डेकाटे | Published: October 21, 2023 1:46 PM

शांतिवन चिचोलीतील संग्रहालय अर्धवटच

आनंद डेकाटे

नागपूर : देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाइपरायटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, त्या टाइपरायटरसह महामानव डॉ. आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातील अनेक ऐतिहासिक वस्तूंना पुन्हा एकदा वाळवी लागण्याचा धोका निर्माण आहे. तसे पाहता या वस्तू आणखी १०० वर्षे टिकून राहाव्यात, यासाठी या ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली आहे. मात्र तीन वर्षे लोटूनही या वस्तू कुलूपबंदच आहेत. त्या संग्रहालयात योग्य पद्धतीने ठेवल्या गेल्या नाहीत, तर त्यांना पुन्हा वाळवी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी कळमेश्वर रोडवर चिचोली या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील बौद्ध प्रशिक्षण केंद्र साकारण्याचा निर्णय घेतला. १९५७ मध्ये गोपिकाबाई बाजीराव ठाकरे या महिलेने त्यांना येथे ११ एकर जागा दान दिली. या जागेवर गोडबोले यांनी ‘शांतिवन’ उभारले. या परिसरातच त्यांनी एक छोटेखानी संग्रहालय उभारले. त्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण समारंभांत वापरलेले कपडे, कोट, घरगुती कपडे, हॅट, छत्री, पेन, कंदील आदींसह दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंसह देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाइपरायटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, तो टाइपरायटर आदी अनेक ऐतिहासिक वस्तू आणि दस्तऐवज शांतिवन चिचोली येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून देशाचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कपड्यांना वाळवी लागणे सुरू झाले होते. तेव्हा शांतिवन चिचोली येथील भारतीय बौद्ध परिषदेने या वस्तूंचे जतन करण्यासाठी शासनाकडे मागणी केली. शासनाने ही मागणी मान्य करीत या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्यांचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टीज, लखनऊ’ या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे या ऐतिहासिक वस्तूंवर नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत रासायनिक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रक्रियेनंतर या वस्तू तब्बल १०० वर्षे टिकून राहणार होत्या. याला आता तीन वर्षे झाली आहेत; परंतु शांतिवन चिचोलीतील मुख्य संग्रहालयाची इमारत अजूनही अपूर्णच आहे. त्यामुळे या वस्तू संग्रहालयात न ठेवता कुलूपबंदच आहेत. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया झाली असली तरी मोकळ्या हवामानात या वस्तू असल्याने त्या नष्ट होण्याची भीती आहे.

संग्रहालयाची भव्य इमारत उभी

शांतिवन चिचोलीसाठी सरकारने ४० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. परंतु, अंतर्गत कामे रखडली आहेत. महामानवाच्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्या वस्तू कुलूपबंदच आहेत. या वस्तू लवकर संग्रहालयात स्थानांतरित झाल्या नाहीत तर त्या नष्ट होण्याचा धोका नाकारता येत नाही.

- संजय पाटील, कार्यवाह, भारतीय बौद्ध परिषद

टॅग्स :SocialसामाजिकnagpurनागपूरDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर