शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

आंभोरा उपसा सिंचन योजनेला थकीत पाणी पट्टीचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:07 AM

वेलतूर : पाणीपट्टी अडल्याने कुही तालुक्यातील आंभोरा उपसा सिंचन योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी न भरल्यास ७,५०० ...

वेलतूर : पाणीपट्टी अडल्याने कुही तालुक्यातील आंभोरा उपसा सिंचन योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी न भरल्यास ७,५०० हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन थांबेल, हे निश्चित.

मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने परिसरातील धानाचे पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी रोवणी खोळंबली आहे. शेतकऱ्यांना आंभोरा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळणे शक्य आहे. मात्र देखभाल दुरुस्ती व विजेचे बिल भरण्यासाठी विभागाकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य नाही. यासंदर्भात कार्यकारी अभियंता के.डी.दमाये यांनी पदाधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेत दहा दिवसात पाणीपट्टी वसूल न झाल्यास सिंचनासाठी पाणी देणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर काही शेतकरी व लोकप्रतिनिधीनी ही योजना बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी केली. यासोबतच थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी सिंचन विभागाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावर दमाये यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना जे शेतकरी पाणी पट्टी भरण्यास तयार नसतील त्यांचे पाणीबंद करण्याचे तसेच त्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोझा चढविण्याचे आदेश दिले. बैठकीला सहायक अभियंता एस.एम.वाहाने, पं.स.सभापती अश्विनी शिवणकर. जि.प.सदस्य कविता साखरवाडे, मांढळ बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, पं. स. सदस्य पंकज मेश्राम, माजी सरपंच ग्यानीवंत साखरवाडे, सुधीर बेले, गुणवंता लांजेवार आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.