शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

संविधानाशी निष्ठा सोडल्यानेच नक्षलवादाचा प्रश्न

By admin | Published: February 20, 2017 2:17 AM

हिंसेला हिंसेने उत्तर दिल्याने प्रश्न सुटत नाही, हे खरे आहे. एकीकडे नक्षलवाद्यांना लोकशाही व्यवस्था व संविधान मान्य नाही.

ई. झेड. खोब्रागडे : भूमकाल संघटनेतर्फे व्याख्यानमालानागपूर : हिंसेला हिंसेने उत्तर दिल्याने प्रश्न सुटत नाही, हे खरे आहे. एकीकडे नक्षलवाद्यांना लोकशाही व्यवस्था व संविधान मान्य नाही. दुसरीकडे सरकार व सरकारी यंत्रणा संविधानाची अंमलबजावणी योग्यरीतीने करीत नाही. सरकारी व्यवस्था व नक्षलवादी शोषित वंचिताच्या बाजूने नाहीत. दोन्ही घटकांनी संविधानावरील निष्ठा सोडल्याने नक्षलवादाचा प्रश्न अधिक चिघळत असल्याचे मत माजी सनदी अधिकारी व विचारवंत ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.भूमकाल संघटनेच्यावतीने ‘प्रजासत्ताक भारतीय संविधानासमोरील नक्षलवादाचे आव्हान’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. हर्ष जगझाप, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. धनराज डहाट आदी मान्यवर उपस्थित होते. ई. झेड. खोब्रागडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांचे दाखले देत या प्रश्नावर प्रकाश टाकला. १३ राज्यांतील २३२ जिल्ह्यांत नक्षलवादाचा प्रभाव आहे. नक्षलवाद्यांना आदिवासी प्रश्नांशी देणे-घेणे नाही. त्यांना बॅलेटऐवजी बुलेटचा वापर करून सत्ता मिळवायची आहे. दुसरीकडे सरकारी व्यवस्था आदिवासींना माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाही. या लोकांबद्दल आस्था व प्रेम नसल्याने न्याय्य हक्कापासून वंचित ठेवल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात आजही ४० टक्के अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. नक्षलवादाच्या नावाने प्रभावित क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व शासकीय यंत्रणेवर कोट्यवधींचा खर्च केला जातो. कोटींचा निधी पुरविला जातो. मात्र तेथील आदिवासी लोकांना थोडासाही लाभ मिळत नाही. उलट नेता, ठेकेदार, प्रशासनातील अधिकारी, पोलीस व शेवटी नक्षलवादी यांच्यामध्ये तो वाटला जातो. त्यामुळे नक्षलवाद संपावा, असे वाटत नाही. म्हणूनच आदिवासी समाजाला नक्षलवादी आणि सरकारी व्यवस्थाही जवळची वाटत नसल्याची खंत खोब्रागडे यांनी व्यक्त केली. संविधानाला न मानणारी नक्षलवादी चळवळ अतिरेकी आणि राष्ट्रविघातक असल्याचे सांगत संवादाने ही समस्या सोडविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.डॉ. हर्ष जगझाप यांनी जातीव्यवस्थेमुळे देशातील इतर समस्यांप्रमाणे नक्षलवादाची समस्या निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले. जातीव्यवस्थेमुळे विशिष्ट जातीजवळ असलेले भांडवल त्यांच्याच जातीत खेळविले जाते. समान विभागणी नसल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत नाही. अशा व्यवस्थेतून नक्षलवादाचा जन्म होतो. त्यामुळे त्यांचे प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या बंदुकीला बंदुकीने उत्तर देणे योग्य नाही. जेव्हा संघर्ष हिंसेच्या पातळीवर येतो तेव्हा प्रश्न सोडविणे अनिश्चित होते.नक्षलवादाकडे भारताच्या परिवर्तनाचे उत्तर नाही तर बुद्ध तत्त्वज्ञानात ते आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी संवाद हा महत्त्वाचा असल्याचे मत डॉ. जगझाप यांनी व्यक्त केले. डॉ. धनराज डहाट यांनी लोकशाही व्यवस्थेत सामान्य माणसांना न्याय मिळत नसेल तर काही देशविघातक शक्ती नक्षलवादाचे निमित्त करून त्याचा फायदा घेत असल्याचे मत व्यक्त केले.विनोबा विचार केंद्र येथे आयोजित व्याख्यानमाला व चर्चासत्राचे संचालन डॉ. श्रीकांत भोवते यांनी केले तर प्रास्ताविक भूमकाल संघटनेचे अध्यक्ष अरविंद सोहनी यांनी केले.(प्रतिनिधी)