शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नशाखोरी आणि वाईट संगतीमुळे ‘त्यांनी’ रक्ताच्या नात्यालाही संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 07:00 IST

Nagpur News वाईट संगत किंवा नशा माणसाला हैवान बनवते. आपण काय करतो, याचे भान त्याला उरत नाही. तो प्रसंगी रक्ताच्या नात्यालाही संपवायला निघतो. नागपुरातही गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देव्यभिचार, नशाखोरीचे दुष्परिणाम गुन्ह्यांमध्ये होत आहे वाढ

नरेश डोंगरे

नागपूर : वाईट संगत किंवा नशा माणसाला हैवान बनवते. आपण काय करतो, याचे भान त्याला उरत नाही. तो प्रसंगी रक्ताच्या नात्यालाही संपवायला निघतो. अलीकडे अशा घटनांमध्ये सर्वत्र सारखी वाढ होत असून नागपुरातही गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. (Due to drug addiction and bad company, ‘they’ also ended the blood relationship)

एमआयडीसी पोलीस स्टेशन

सोळाव्या वर्षीच तिला मित्रांचा नाद लागला. अमली पदार्थांचे व्यसनही जडले. त्यातून तिने घर सोडले आणि मित्रांसोबत राहू लागली. व्यसनपूर्तीसाठी पैसे मिळेनासे झाल्यामुळे तिने आपल्या आजीचे घर गाठले. मित्राच्या मदतीने आजीची हत्या केली. तिचे सोने तसेच रोख रक्कम घेऊन ती पळून गेली. मात्र, पोलिसांनी तिच्या अखेर मुसक्या आवळल्या.

 वाडी पोलीस स्टेशन

वर्षभरापूर्वी तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले. अल्पवयातच तिने सर्व मर्यादा ओलांडल्या. आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर ती प्रियकराला घरात बोलवून त्याच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करू लागली. एक दिवस अचानक बारा वर्षांचा भाऊ घरी धडकला. त्याने बहीण आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत बघितले. तो आता आई-वडिलांना सांगणार म्हणून तिने प्रियकराच्या मदतीने छोट्या भावाची हत्या केली.

कपिल नगर पोलीस स्टेशन

दहावीत असलेला तो मित्राच्या वाईट संगतीमुळे मोठ्या माणसासारखा वागू लागला. आई, बहिणीला धमकावू लागला. घरात बहिणीचा मित्र येतो, ही बाब त्याला नेहमी खटकत होती. म्हणून त्याने बहिणीच्या मित्राशी वाद घातला आणि त्याची हत्या केली.

 हुडकेश्वर पोलीस स्टेशन

घरची आर्थिक स्थिती अतिशय चांगली. एकटा मुलगा म्हणून त्याचे लहानपणापासून कोडकौतुक होऊ लागले. त्याला जे पाहिजे ते करण्याची वडिलांनी मुभा दिली. तो जिममध्ये गेला आणि त्याने चांगले पीळदार शरीर कमाविले. नंतर मात्र त्याला व्यसन जडले. तो चक्क इंजेक्शन टोचून घेऊ लागला. व्यसन केल्यानंतर त्याचे मानसिक संतुलन बिघडू लागले. एक दिवस त्याने स्वतःच्या वडिलांचीच निर्घृण हत्या केली.

 

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

व्यसनामुळे माणसाचे स्वतःवरचे संतुलन संपते.

अमली पदार्थांचे व्यसन जडल्यामुळे माणसाचा मेंदू चांगले काय, वाईट काय याबाबत फारसा विचार करत नाही. नशापूर्ती हेच एकमेव उद्दिष्ट त्याच्यासमोर असते आणि नशा चढली की त्याचे स्वतःवरचे नियंत्रण संपते. या अवस्थेत तो कोणाचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही.

वाईट संगतीचा परिणाम वाईटच

आपण ज्यांच्यासोबत राहतो ते गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्यापासून दूरच राहिले पाहिजे. अन्यथा आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागू शकते, याचे भान संबंधित व्यक्तीला उरत नाही. वाईट मित्रांच्या संगतीमुळे तो त्यांचे अनुकरण करतो आणि एखादा मोठा गुन्हा करून बसतो.

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी