शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
3
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
4
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
5
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
6
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
7
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
8
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
9
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
10
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
11
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
12
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
13
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
14
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
15
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
16
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
17
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
18
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
19
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
20
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

खोदकामामुळे नागपुरात ६.८७ कोटींची वीज केबल खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:14 AM

शहरामध्ये ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात येत आहे. सिमेंट रोड व उड्डाण पूल तयार होत आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. परंतु, या कामामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे१७८ ठिकाणी नुकसान विकास एजन्सीजनी दिली नाही भरपाई

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरामध्ये ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात येत आहे. सिमेंट रोड व उड्डाण पूल तयार होत आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. परंतु, या कामामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे. मार्च-२०१७ पासून आतापर्यंत १७८ ठिकाणांवरील एकूण ६.८७ कोटी रुपयांचे वीज केबल खराब झाले आहेत. वीज वितरण फ्रेन्चायसीने भरपाईची मागणी केली असून विकास एजन्सीज त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.केबल खराब करण्याची सुरुवात १ एप्रिल रोजी भगवाननगरातून झाली. एल अ‍ॅन्ड टी कंपनीने स्मार्ट सिटी वर्क योजनेंतर्गत केलेल्या खोदकामात ३.६० लाख रुपयांचे वीज केबल पूर्णपणे खराब झाले. ३७६० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला. त्यानंतर हे प्रकार सतत सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, ओसीडब्ल्यू, रिलायन्स आदींनी खोदकाम करताना विजेचे केबल खराब केले. २०१७ मध्ये ९७ ठिकाणी वीज केबलचे नुकसान झाले.२०१८ मध्येही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ जानेवारी रोजी नारा येथे खोदकाम करताना वीज केबल खराब केले. त्यामुळे २८ हजार ९९८ ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला व ४ लाख ७३ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले. १७ आॅगस्ट रोजी मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान लष्करीबाग येथे ३ लाख ६० हजार रुपयांचे केबल खराब करण्यात आले. त्यामुळे १० हजार ६२४ ग्राहकांची वीज बंद पडली. एसएनडीएलने या सर्व प्रकरणांची माहिती महावितरणला दिली आहे. विकास एजन्सीजना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. परंतु, त्यावर कुणीच उत्तर दिलेले नाही. सध्या केबलची तात्पुरती दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. परिणामी, कोणत्याही क्षणी वीज पुरवठा बंद होऊ शकतो. तसेच, विजेचा प्रवाह पसरून प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खोदकाम करताना नकाशा पाहिला जात नाहीकुठेही खोदकाम करताना पाईप लाईन व विजेचे केबल कुठे आहे याची माहिती घेण्यासाठी नकाशे पाहणे आवश्यक आहे. काही ठिकाणी जुनी पाईप लाईन असल्यामुळे त्याचे नकाशे उपलब्ध नाहीत. परंतु, पाईप लाईन कुठून जात आहे याची माहिती उपलब्ध आहे. दोन्ही एजन्सीजनी आपसात समन्वय ठेवल्यास नुकसान टाळले जाऊ शकते. नियमानुसार मनपा व महावितरण कंपनीला खोदकामाची माहिती देणे अनिवार्य आहे. परंतु, विकास एजन्सीज हा नियम पाळत नाही. त्यामुळे नुकसान तर होतेच, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही बळावते.

खोदकामामुळे वीज केबल खराब होत असल्याची माहिती विकास एजन्सीजसह पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना देण्यात आली आहे. कंपनीला भरपाईपेक्षा वीज केबलची जास्त चिंता आहे. खराब झालेले केबल दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. भविष्यात ब्रेकडाऊन होऊ शकतो. त्यावेळी खोदकाम करून नवीन केबल टाकावे लागतील.- सोनल खुराणा, बिझनेस हेड, एसएनडीएल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा