शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

लॉकडाऊन वाढल्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट : प्रवासी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 22:36 IST

Passengers decreased at the bus stand कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याची अट घालून दिली. त्यामुळे एसटीच्या नागपूर विभागात केवळ १६ फेऱ्यांची वाहतूक होत असल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर शुकशुकाट पसरला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात फक्त १६ फेऱ्यांची वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याची अट घालून दिली. त्यामुळे एसटीच्या नागपूर विभागात केवळ १६ फेऱ्यांची वाहतूक होत असल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर शुकशुकाट पसरला आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने २२ मार्च २०२० पासून १५ सप्टेंबर २०२० पर्यंत एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीची वाहतूक सुरू झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२० तसेच जानेवारी आणि १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एसटीची वाहतूक सुरळीत सुरू होती; परंतु त्यानंतर एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले होते. एका बसमध्ये केवळ २२ प्रवासीच बसविण्यात येत होते. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा १५ एप्रिल २०२१ पासून १ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. हे लॉकडाऊन १५ मे पर्यंत आणि त्यानंतर ३१ मे पर्यंत वाढविण्यात आले. कोरोनाच्या पूर्वी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ७२० फेऱ्यांची वाहतूक होत होती. ४१० बसेस १ लाख ६० हजार किलोमीटरचा प्रवास करीत होत्या. एकूण २० हजार प्रवाशांच्या वाहतुकीद्वारे नागपूर विभागाला दररोज ४८ लाखांचे उत्पन्न मिळत होते; परंतु सध्या विभागात केवळ १६ फेऱ्या चालविण्यात येत आहेत. केवळ २५०० किलोमीटर बसेस धावत असून, विभागाला दररोज फक्त ६० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. यात प्रवाशांची संख्या ५०० वर आली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाला लॉकडाऊनमुळे चांगलाच फटका बसला आहे.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकnagpurनागपूर