शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

पाण्याविना धूळवड!

By admin | Published: March 26, 2016 2:34 AM

होळी म्हटली की पाणी आलेच ! पाण्याशिवाय होळी खेळण्याची कल्पनाच करता येत नाही.

नागपूर : होळी म्हटली की पाणी आलेच ! पाण्याशिवाय होळी खेळण्याची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच होळीमध्येच लाखो लिटर पाणी वाया जाते. परंतु यंदाचे वर्ष हे भीषण पाणीटंचाईचे आहे. नागपुरात टंचाई नसली तरी राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. यावेळी पाण्याची नासाडी होऊ नये म्हणून कोरडी होळी खेळून पाणी वाचवण्यासंबंधी आवाहने करण्यात आली होते. नागपूरकरांनीही याला चांगली साद देत एक आदर्श घालून दिला आहे. शहरात अनेक ठिकाणी गुलालासोबत कोरडी होळी खेळून नागपूकरांनी लाखो लिटर पाण्याची बचत केली. रंगांची उधळणसुद्धा झाली, परंतु त्यासाठी पिण्याचे पाणी न वापरता विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याचा वापर करण्यात आला. राज्यात इतर भागात दुष्काळ आहे. नागरिकांनाही याची कल्पना आहे. यामुळेच प्रशासनिक स्तरापासून तर सामान्य नागरिकांपर्यंत पाणी वाचवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. नागरिकांना रंग न खेळता गुलालाची कोरडी होळी खेळण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनीही आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडून आदर्श निर्माण केला. शहरात नेटवर्क परिसरात पाणीपुरवठा करणारी कंपनी ओसीडब्ल्यू आणि नॉन नेटवर्क परिसरात मनपा जलप्रदाय विभागातर्फे पाणीपुरवठा केला जातो. होळीच्या दिवशी एकही टँकर रस्त्यावर धावले नाही. शुक्रवारी नेटवर्क परिसरात टँकरच्या ६५० फेऱ्या आणि नॉन नेटवर्क परिसरात १९०० फेऱ्या झाल्याची माहिती आहे. याच प्रकारे २५५० टँकरच्या फेऱ्या झाल्या. दररोज इतक्याच फेऱ्या टँकर लावत असतात. एका टँकरमध्ये ४ हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असते. यापेक्षा अधिक क्षमतेचे टँकर सुद्धा आहेत. याची बेरीच केली तर लाखो लिटर पाण्याची एकाच दिवशी बचत झाली.