शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

थंडीत सुकामेवा खा अन् ठणठणीत रहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 20:32 IST

Nagpur News महागाची औषधी खाण्यापेक्षा कधीही सुकामेवा आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे. त्यामुळेच हिवाळ्यात सुकामेवा खा व ठणठणीत राहा, असे म्हटले जाते.

ठळक मुद्देमागणी वाढल्यानंतरही दर स्थिरसुकामेव्याचा आहारात समावेश करा

नागपूर : आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्याचा मोसम म्हणजे आल्हादायक काळ असतो. या दिवसात सुकामेवा खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी मूठभर सुकामेवा खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर, मनुका यांचा बऱ्याच खाद्यपदार्थांमध्येही वापर केला जातो. या सर्व सुक्यामेव्याचे स्वत:चे गुणधर्म आहेत. थायरॉइड, हृदयाचे आरोग्य आणि मेंदूच्या आरोग्यासह कर्करोगासारख्या रोगांशी लढण्यास मदत करते. यामुळे महागाची औषधी खाण्यापेक्षा कधीही सुकामेवा आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे. त्यामुळेच हिवाळ्यात सुकामेवा खा व ठणठणीत राहा, असे म्हटले जाते.

सुकामेवा हे बहुतेकदा श्रीमंताचे खाणे समजले जाते. आर्थिकदृष्ट्या तर ते महाग आहेच; पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक श्रीमंत आहेत. म्हणूनच सुकामेवा खाणे गरजेचे आहे. हिवाळ्यात त्वचा रखरखीत होते. या दिवसात त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते, तसेच स्निग्धताही कमी होते. थंडीच्या दिवसात त्वचेवर नखाने कोरले तर पांढरे ओरखडे पडतात. वास्तविक थंडीत आपल्याला घाम कमी येतो. तहानही कमी लागते. म्हणून आपण पाणी कमी पितो. त्वचेवरील स्निग्धता जपायची असेल, तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बदाम व अक्रोडचे सेवन करणे.

कमीत कमी दहा बदाम व दोन ते तीन अक्रोड दररोज खाणे चांगले. त्यातून शरीराला व्यवस्थित ओमेगा-३चे जीवनसत्त्व मिळते. बदाम व अक्रोड प्रत्येकालाच परवडत नाही. अशावेळेस मूठभर शेंगदाणे व वितभर सुक्या खोबऱ्याचा तुकडा खावा. अर्थात एखाद्याला हृदयरोगाचा त्रास किंवा रक्तदाबाचा विकार नसल्यास हा उपाय स्वस्त व मस्त आहे. डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. तुपामुळे शरीरात स्निग्धता येते. खजूर, मनुका, काळा मनुका, अंजीर यामध्ये साखरेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे आपल्याला कमी खाऊनही शक्ती मिळते. त्यामुळे थंडीत आहार उत्तम ठेवला तर मनाने व शरीराने मजबूत राहता येईल.

सुकामेवा खातोय भाव (ठोक भाव, किलो, दर्जानुसार)

काजू ६४०-८००

बदाम ५६०-६२०

पिस्ता ९००

डिंक १८०-२५०

गोडंबी ७००

अंजीर ७००-११००

अक्रोड ६००-६५०

चारोळी १२५०

थंडीत सुकामेवा का खावा?

हिवाळ्यात शरीर थंड पडते. सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात आणि ऊर्जा मिळते. या खाद्यपदार्थांतून कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषक तत्त्व शरीराला उपयोगी पडतात. हा ऋतूनुसार आहार आहे. यातून ओमेगा-३ फॅटी ॲसिड, झिंक मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढते.

जयश्री पेंढारकर, आहारतज्ज्ञ.

सुकामेवा खाताना ही घ्या काळजी

सुकामेवा नेहमीच नियमित समप्रमाणात खावा. नेहमीच पाण्यात भिजवून खाल्ल्यास शरीराला फायदा होतो. सुकामेवा खाताना अतिरेक करू नये. सुकामेवा दररोज थोडा थोडा खाल्ल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. सुकामेव्याची पावडर करून भाजून घ्यावी. त्यामुळे शरीराला फायदा होतो.

डिंक लाडू, मेथी लाडू खायलाच हवेत

थंडीत शारीरिक श्रम कमी होतात. त्यामुळे बद्धकोष्टता वाढते. त्यामुळे डिंक लाडू किंवा मेथी लाडू खायला हवेत. वर्षभर मेथी अर्धा वा पूर्ण चमचा खावी. लाडू करून खाल्ल्यास अधिक चांगले असते. त्यामुळे शरीराला पोषक तत्त्व मिळतात. त्यात साखर घालू नये.

मागणी वाढली

हिवाळ्यात सुकामेव्याला मागणी वाढली आहे. या दिवसात बदाम सर्वाधिक विकले जातात. तसे पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमीच आहेत. सध्या काजू, बदाम, अक्रोड आणि डिंकाला मागणी वाढली आहे.

भवरलाल जैन, व्यापारी.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य