शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बाजारभावानुसार मिळणार शाळांना अंड्याचे अनुदान; शासनाचा निर्णय

By गणेश हुड | Updated: December 30, 2023 16:54 IST

शासनाने आता राष्ट्रीय अंडी समन्वय समित[ने निर्धारीत केलेल्या बाजारभावाप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश हूड,नागपूर :  स्थानिक स्वराज्य संस्था व  सरकारी शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी देण्यात येतात. मात्र यासाठी बाजारभावानुसार अनुदान मिळत नव्हते. प्रति अंडे पाच रुपये अनुदान मिळत होते. मात्र बाजारात अड्यांचा दर प्रति अंडे ६ ते ६.५० रुपये आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांची चिंता वाढली होती.  शासनाने आता राष्ट्रीय अंडी समन्वय समित[ने निर्धारीत केलेल्या बाजारभावाप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 

नुकत्याच काही दिवसापुर्वी महाराष्ट्र शासनाने एका शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत एक डिसेंबरपासून सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी तसेच अंडी न खाणा-या विद्यार्थ्यांना केळी देण्याचा निर्णय घेतला प्रतिअंडे पाच रूपये प्रमाणे अनुदान निर्धारीत करण्यात आले होते . परंतू बाजारात अंड्यांचा दर हा प्रतिअंडे  सहा ते साडेसहा रूपयाच्या घरात असल्याने विद्यार्थ्यांना अंडी पुरविण्यात मुख्याध्यापकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे अंड्यासाठी देण्यात येणारे अनुदान वाढवून मिळण्यात यावे अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती.

शासनाने आपल्या पुर्वीच्या निर्णयात सुधारणा करत नवीन शासन निर्णय निर्गमित केला त्यानुसार आता शाळांना राष्ट्रीय अंडी समन्वय समिती कडून निर्धारित केलेल्या बाजारभावानुसार अनुदान प्राप्त होणार आहे.  या निर्णयामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला आहे.निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी :

सध्या प्रतिअंडे पाच रूपये प्रमाणेच शाळांना अनुदान अग्रीम स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. सुधारीत शासन निर्णयानुसार बाजार दरानुसार अग्रीम स्वरूपात अनुदान उपलब्ध  करण्यात यावे -लीलाधर ठाकरे , जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,जिल्हा-नागपूर

टॅग्स :nagpurनागपूरfoodअन्न