शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

नागपुरात मुस्लीम बांधवांचा एल्गार; संविधान बचाव रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 10:32 IST

शुक्रवारी नागपुरात मुस्लीम समाजाने भव्य अशी संविधान बचाव रॅली काढून संविधानाच्या संरक्षणाचा एल्गार केला.

ठळक मुद्देसीएए-एनसीआर रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकता संरक्षण कायद्या (सीएए) आणि येऊ घातलेला एनआरसी, एनपीआर च्या विरोधात मुस्लीम समाज देशभरात रस्त्यावर उतरला आहे. हा कायदा संविधानविरोधी असून आज संविधानच धोक्यात आले आहे. त्यामुळे सर्वप्रथम संविधान वाचवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नागपुरातही मुस्लीम समाजाने भव्य अशी संविधान बचाव रॅली काढून संविधानाच्या संरक्षणाचा एल्गार केला. या रॅलीमध्ये मुस्लीम समाजासोबतच बौद्ध, ख्रिश्चन, शिख, ओबीसी आदींसह विविध धर्माचे व समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नागरिकता संशोधन कायदा (सीएए) आणि त्यासोबतच एनआरसी व एनपीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी फारुखनगर येथून संविधान बचाव रॅली काढण्यात आली. ही रॅली आसीनगर, कमाल चौक, पाचपावली उड्डाणपूल, गोळीबार चौक, टिमकी, मोमीनपुरा, सीए रोड रामझुला, कस्तूरचंद पार्क होत संविधान चौकात पोहोचली. यावेळी प्रामुख्याने मुस्लीम धर्मगुरू मौलाना सय्यद आलमगीर अशरफ, शीख समाजाचे सरदार मलकीत सिंह, मुफ्ती मोहम्मद अकरम, बौद्ध धम्माचे भदंत सदानंद महाथेरो, भदंत ज्ञानबोधी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मौलाना आलमगीर अशरफ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या सरकारने नागरिकता संशोधन कायद्यात (सीएए) एका धर्माला वगळले आहे. या माध्यमातून सरकार देशातील एकता नष्ट करू पाहत आहे. धर्माच्या आधारावर कायदा करता येत नाही. त्यामुळे हा कायदा भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध आहे. यात उघडपणे भेदभाव केला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे, त्यात समानता आहे. सरकार भारतीय संविधानाला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु देशातील जनता हे कधीही होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जेव्हापर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.यानंतर एका शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नावे एक निवेदन सोपवण्यात आले. यात नागरिकता संशोधन कायदा रद्द करणे, एनपीआर परत घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच पूर्वीप्रमाणे जनगणना करून एनआरसी रोखण्याची मागणी केली गेली.यावेळी जलील अंसारी, अकील अफसर, माजी मंत्री अनिस अहमद, नगरसेवक इब्राहिम टेलर, हाफिज अख्तर आलम अशरफी, हाफिज अब्दुल बासित, अतीक मालिक, पार्षद मनोज सांगोळे, हाजी आसिफ, इकबाल अंसारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्रcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक