शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

बलाढ्य भारतासाठी इंजिनिअर्सनी आत्मनिर्भर बनावे: एअर मार्शल विजय कुमार गर्ग

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 4, 2023 23:28 IST

५६ वा ‘इंजिनिअर्स डे’ समारंभ

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : इंजिनिअर्सचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. आताचे इंजिनिअरिंग लोकांच्या सुरक्षेसाठी आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. युवा इंजिनिअर्स कोअर शाखांपासून बाजूला जात आहेत. आता त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे. बलाढ्य भारतासाठी इंजिनिअर्सनी आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन इंडियन एअर फोर्स नागपूर हेडक्वार्टर मेंटनन्स कमांडचे एअर मार्शल विजय कुमार गर्ग येथे केले.

५६ वा ‘इंजिनिअर्स डे’ समारंभ इ इन्स्टिट्यून ऑफ इंजिनिअर्सच्या (इंडिया) उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर सेंटरमध्ये बुधवारी पार पडला. त्यावेळी मुख्य अतिथी व मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हाइस अॅडमिरल (निवृत्त) किशोर ठाकरे तर मंचावर नागपूर सेंटरचे अध्यक्ष मिलिंद पाठक आणि सचिव डॉ. जे.एफ. अग्रवाल उपस्थित होते. यावेळी वयाच्या ७५ व्या वर्षी एएमआयई पदवी संपादन करणारे किसन बकाले यांचा सत्कार करण्यात आला. गर्ग म्हणाले, इंजिनिअर्स देशाच्या विकासाचा कणा आहे. त्यांना जनतेनी सहकार्य करावे.

किशोर ठाकरे म्हणाले, देशाच्या संरक्षण खात्यात वेळोवेळी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. विदेशी तंत्रज्ञानाचा कमी अवलंब करतानाचा भारत या उत्पादनात आत्मनिर्भर होत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स संस्था देशाच्या विकासात उत्तम कार्य करीत आहेत. नागपूर सेंटरतर्फे निरनिराळे कार्यक्रम राबवून ज्ञानाची देवाणघेवाण करीत आहेत.

मिलिंद पाठक म्हणाले, इंजिनिअर्सनी आत्मनिर्भरतेवर जास्त लक्ष केंद्रीत करावे. त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे. अग्रवाल यांनी हा दिवस सर्वच इंजिनिअर्ससाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन संजय तत्त्ववादी यांनी केले तर डॉ. जे.एफ. अग्रवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमात संस्थेचे माजी अध्यक्ष सतीश रायपुरे, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स कोलकाताचे माजी अध्यक्ष हेमंत ठाकरे, पी.के. कुळकर्णी, एस.एस. डोईफोडे, व्ही.के. अळकरी, डॉ. महेश शुक्ला, डॉ. आर.एल. श्रीवास्तव, व्ही.पी. वर्गीस, डॉ. एस.बी. जाजू, डॉ. हेमंत बैतुले, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आणि इंजिनिअर्सचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर