शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पर्यटनाचा आनंद घ्या, जीवावर बेतेल असे धाडस करू नका

By आनंद डेकाटे | Updated: July 5, 2024 17:36 IST

जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर : नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी असलेली विविध स्थळे, तलाव, ओढे, नदीचे किनारे, धरणे ही पर्यटकांना नेहमी भूरळ घालतात. पर्यटनाचा आनंद घेताना आपल्या जीवावर धाडस बेतणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सर्व दक्षता व योग्य ती खबरदारी घेतली असून नागरिकांनी स्वयंशिस्त व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात विशेषतः वाकी, झिल्पी, खिंडसी, वेणा अंबाझरी, रामा, राखी इत्यादी तलाव आहेत. तसेच कन्हान, पेंच, वेना इत्यादी नदी व आंभोरा देवस्थान, घोघरा महादेव, धापेवाडा विठ्ठल मंदिर आहेत. या वर्दळीच्या ठिकाणांवर दुर्घटना व आपत्ती टाळण्यासाठी व त्याच्यावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित खात्यांच्या विभाग प्रमुखांना आपत्ती व्यवस्थानांतर्गत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिले आहे.

तलाव, नदी, व इतर जलाशय ठिकाणांच्या कड्यांवर असलेले प्रेक्षणीय पाईंटस या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करुन त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेखा आखावी व त्या नियंत्रण रेषेच्या पुढे पर्यटक जाणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात यावी, तेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून स्पष्ट सूचना असलेले फलक लावणेत यावेत. पर्यटकांसाठी 'काय करावे आणि काय करु नये' या बाबतचे सूचना फलक लावण्यात यावे. आपत्ती प्रवण जलपर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीव रक्षक लाईफ जॅकेटस, रेस्क्यू बोटी इत्यादी ठेवण्यात यावे. आवश्यकतेनुसार स्थानिक पातळीवर अशा जलपर्यटन ठिकाणी वेळेचे बंधन ठेवावे. नदी, नाले यांच्यावरील पुलावरून किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असल्यास संबंधित विभागाने असे रस्ते बंद करून तेथील वाहतूक तात्पुरती बंद करावी. जे रस्ते, पुल आपत्तीप्रवण आहेत अशा ठिकाणी काही अंतराआधीच चेतावणीचे फलक लावावे.जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात पर्यटनाच्या ठिकाणी जीवितहानी होणार नाही यासाठीच्या उपाययोजनांची काटेकारपणे अंमलबजावणी करण्यात यावी. दिरंगाई किवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी आणि विभाग प्रमुख हे जबाबदार राहतील, याची नोंद घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलnagpurनागपूर