शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन संथच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:04 AM

मुंबई विद्यापीठातील प्रलंबित निकालांवरून राजकारण तापले आहे. तेथील वाणिज्य विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन नागपुरात सुरू असून महिना उलटून गेल्यानंतरदेखील मूल्यांकन अद्यापही संथ गतीनेच सुरू आहे.

ठळक मुद्देमहिना उलटला : मूल्यांकनाचा आकडा १७ हजारांच्या आतच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई विद्यापीठातील प्रलंबित निकालांवरून राजकारण तापले आहे. तेथील वाणिज्य विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन नागपुरात सुरू असून महिना उलटून गेल्यानंतरदेखील मूल्यांकन अद्यापही संथ गतीनेच सुरू आहे. मूल्यांकनादरम्यान तांत्रिक अडचणींचचा सामना करावा लागत आहे. ज्या कालावधीत लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व्हायला हवे होते, तेथे आतापर्यंत १७ हजार उत्तरपत्रिकादेखील पूर्णपणे तपासून झाल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असून लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रलंबित आहे. राज्यपालांनी दिलेली ‘डेडलाईन’ निघून गेल्यानंतरदेखील मूल्यांकन पूर्ण झालेले नाही. धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांनी महाविद्यालयात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला जागा उपलब्ध करून दिली होती. तेथे वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू आहे. मात्र वारंवार येणाºया तांत्रिक अडथळ्यांमुळे आतापर्यंत मूल्यांकन झालेल्या उत्तरपत्रिकांनी १७ हजारांचा आकडादेखील गाठलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.सुरुवातीच्या चर्चेनुसार १० दिवसांतच साधारणत: लाखभर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन होईल, असा अंदाज होता. मात्र मुंबई विद्यापीठातील मूल्यांकनाचे ‘सॉफ्टवेअर’ वेगळे आहे. शिवाय संथ ‘सर्व्हर’मुळे उत्तरपत्रिका ‘ट्रान्सफर’ करण्यास वेळ लागतो आहे. महिना उलटून गेल्यानंतरदेखील ही समस्या दूर झालेली नाही. त्यामुळे लाखोंऐवजी केवळ १७ हजारांच्या आसपासच उत्तरपत्रिकांचेच मूल्यांकन होऊ शकले आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात डॉ. बबन तायवाडे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.