शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पुरात स्वप्नही वाहून गेले....; नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 20:58 IST

Nagpur News गत आठवड्यात ढगफुटीसदृश झालेल्या अतिवृष्टीने नागपूर जिल्ह्यात सावनेर, भिवापूर, उमरेड, कुही, नरखेड आणि काटोल तालुक्यातील शेती अक्षरशः खरडून नेली. नदी-नाल्यांचे पाणी शिवारात शिरले.

नागपूर : गत आठवड्यात ढगफुटीसदृश झालेल्या अतिवृष्टीने नागपूर जिल्ह्यात सावनेर, भिवापूर, उमरेड, कुही, नरखेड आणि काटोल तालुक्यातील शेती अक्षरशः खरडून नेली. नदी-नाल्यांचे पाणी शिवारात शिरले.

महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २९ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा उत्पादन चांगले होईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र पुरात स्वप्न वाहून गेले आहे. आता सरकार मदत करेल, या आशेवर तो जीवन जगतो आहे.

२६ जणांचा गेला जीव

नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार १ जूनपासून २२ जुलैपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे २६ जणांचा जीव गेला आहे. २२ जण जखमी झाले. १९५ पशुहानी झाली. ५३३ पक्ष्यांचाही मृत्यू झाला. तर १५१९ घरे, गोठे, व झोपड्यांचे नुकसान झाले आहे. तलावाचा बांध फुटल्याने नागपूर ग्रामीण तालुक्यातील जुनापाणी गाव बुडाले.

सावनेर, उमरेड, भिवापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान

मुसळधार पावसामुळे सावनेर, उमरेड आणि भिवापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सावनेर तालुक्यात ५ हजारांहून अधिक हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. ५० हून अधिक गावांत पुराचे पाणी शिरले. भिवापूर तालुक्यात ५,३३४ शेतकऱ्यांचे ५,५०७ हेक्टरवर शेतातील पिकांचे नुकसान झाले. उमरेड तालुक्यात ७,५५२.२७ हेक्टर क्षेत्रातील पिकास फटका बसला.

शेती बुडाली, मुलांना कसं शिकवू ?

काटोल तालुक्यातील चिखली नजीकच्या गोन्ही शिवारात बाबाराव काळे यांच्या ४ एकर शेती आहे. दीड एकरात सोयाबीन आणि तूर लावली होती. तर उर्वरित जागेवर पऱ्हाट होती. बियाणे अंकुरताना मुसळधार पावसाने घात केला. अख्खे शिवार पाण्याखाली आले. आता पिके सडू लागली आहे. शेतीसाठी एक लाखाचे कर्ज झाले. नववी आणि बारावीत असलेल्या मुलांचे शिक्षण करायचे आहे. साहेब यंदा सारेच बुडाले, मुले कसे शिकवू, काय खाऊ? असा पाणावलेल्या डोळ्यांनी प्रश्न त्यांना विचारला.

शेतात तळे, पिके पवळी !

सावनेर तालुक्यात शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी आहे. दोन दिवस उघड मिळाली. मात्र, आता पुन्हा ढग दाटून आले. अतिपावसाने खुबाळा, रिचा, सावनेर, कुसुंबी, नांदोरी, बडेगाव, खापा, उमरी जांभळापाणी, सिल्लोरी, बिचवा, कोच्छी, भेंडाळा, वाकोडी, गडेगाव, आंगेवाडा, तिघही, टेंभुरडोह शिवारातील पिके पिवळी पडू लागली आहेत.

रात्र जागून काढली...

गत रविवारी भिवापूर तालुक्यातील १० वर गावांत पुराचे पाणी शिरले. मध्यरात्रीच्या सुमारास नांद, चिखलापार, वणी, खरकाळा, धामनगाव (वि.म.), वडध, चिखली, जवळी, रोहणा आदी दहा गावांतील असंख्य घरांत पुराचे पाणी शिरल्यामुळे येथील ग्रामस्थांना अख्खी रात्र जागून काढावी लागली.

टॅग्स :floodपूर