शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले : परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत कामे ठप्पच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 10:34 PM

लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक असलेले कामगार गावी गेले आहेत. काही दिवसांनी लॉकडाऊन संपला तरी निर्माण झालेली परिस्थिती बघता कामगार परण्याची शक्यता नाही. त्यामुळे परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत विकासकामे ठप्पच राहणार आहेत.

ठळक मुद्देसिमेंट रोडसह विकासकामांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक असलेले कामगार गावी गेले आहेत. काही दिवसांनी लॉकडाऊन संपला तरी निर्माण झालेली परिस्थिती बघता कामगार परण्याची शक्यता नाही. त्यामुळे परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत विकासकामे ठप्पच राहणार आहेत.महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता मनपा आयुक्तांनी नवीन विकासकामांना ब्रेक लावले होते. सुरू असलेले प्रकल्प, सिमेंट रोडची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. अर्धवट सिमेंट रोडची कामे पावसाळ्यापूर्वी होतील, अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊन सुरू होताच कामे ठप्प पडली. महापालिकेत लहानमोठे २०० कंत्राटदार आहेत. प्रत्येकाकडे सरासरी २० ते २५ कामगार आहेत. म्हणजेच ४ ते ५ हजार कामगार काम करीत होते. यात प्रामुख्याने मध्य प्रदेशातील कामगारांचा समावेश आहे.तसेच इंजिनिअर, ट्रकचालक, टिप्पर चालक अशा कुशल कामगारांचाही यात समावेश आहे. आधीच बिल वेळेवर मिळत नाही. त्यात अर्धवट कामामुळे कंत्राटदारांना बिल सादर करणे शक्य नाही. पुढे काही महिने बिल मिळण्याची शक्यता नाही. अशा कोंडीत कंत्राटदार सापडले आहेत. होळीसाठी गावी गेलेले कामगार परतले होते. पण लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने व जवळ पैसे नसल्याने कामगार मिळेल त्या साधनाने गावी गेले. मनपा कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. अशा परिस्थितीत कामगारांना थांबविण्यासाठी त्यांना देण्यासाठी कंत्राटदारांकडे पैसै नव्हते. त्यामुळे कामगारांना थांबविणे शक्य झाले नाही.पावसाळ्यापूर्वी सिमेंट रोड पूर्ण होणे अशक्यलॉकडाऊनमुळे सिमेंट रोडसह प्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. कामगार त्यांच्या गावी गेल्याने इतक्यात ते परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे सिमेट रोडची अर्धवट कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.कामगार नाहीत, सिमेंटचे दरही वाढलेनवीन कामांना मंजुरी नाही. जुनी कामे सुरू होती. त्यात पावसाळ्यानंतर मनपातील कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. वेळेवर बिले मिळत नाहीत. लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले आहेत. स्थानिक कामगार बांधकाम क्षेत्रात काम करीत नाहीत. कंत्राट घेतला तेव्हा सिमेंटच्या बॅगेची किंमत २४० रुपये होते. आता ३७० रुपये झाली आहे. पुढे पावसाळा सुरू होईल. अशा अडचणीत मनपातील कंत्राटदार सापडले आहेत. प्रशासनाने किमान बिल दिले तर थोडा दिलासा मिळेल. विजय नायडू, अध्यक्ष, मनपा कंत्राट संघटना

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगार