शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

नररुपी सैतान राजू बिरहाची फाशी रद्द, हायकोर्टाने सुनावली ३० वर्षे कारावासाची शिक्षा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 31, 2023 16:03 IST

तीन मित्रांची शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण हत्या करणारा गुन्हेगार

नागपूर : वागदरा शिवार येथील चहा व पान टपरीच्या जागेवरून वाद झाल्यानंतर तीन मित्रांची शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण हत्या करणारा नररुपी सैतान राजू छन्नूलाल बिरहा (५५) याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने रद्द करून त्याला ३० वर्षे कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला.

ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना नाही. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. परंतु, आरोपीने तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. त्यासाठी त्याला ३० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तसेच, सरकारला त्याला या शिक्षेत सूट देता येणार नाही, असे उच्च न्यायालय निर्णयात म्हणाले.

सत्र न्यायालयाने बिरहाला २८ डिसेंबर २०२२ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर केले होते. तसेच, या शिक्षेविरुद्ध बिरहाने अपील दाखल केले होते. त्यावर गेल्या जुलैमध्ये अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता.

समाजाला हादरवून सोडणारी ही घटना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० च्या सुमारास वागदरा शिवार, ता. हिंगणा येथे घडली होती. मृतांमध्ये सुनील हेमराज कोटांगळे (३१), आशिष ऊर्फ गोलू लहुभान गायकवाड (२६) व कैलाश नारायण बहादुरे (३२) यांचा समावेश आहे. आरोपी राजू बिरहाने अत्यंत क्रूर व अमानवीय पद्धतीने हा गुन्हा केला. त्याने आधी बहादुरेवर हल्ला केला होता. कोटांगळे त्याला वाचविण्यासाठी गेला असता, शरीरात सैतान संचारलेला बिरहा बहादुरेला सोडून कोटांगळेवर तुटून पडला. बिरहाने कोटांगळेच्या पोटावर, गळ्यावर व डोक्यावर सत्तूरचे सपासप वार केले. तो कोटांगळेला ठार करीत असताना जखमी बहादुरे व गायकवाड संदेश सिटीच्या रस्त्याने पळून गेले. त्यामुळे बिरहारने बहादुरेला पाठलाग करून पकडले व त्याचाही निर्घृण खून केला.

दरम्यान, दूरपर्यंत पळून गेलेल्या गायकवाडला बिरहाने दुचाकीवरून पाठलाग करून पकडले व त्यालादेखील जाग्यावरच ठार मारले. आरोपी बिरहा व कोटांगळे हे दोघेही वृंदावन सिटी गृह प्रकल्पापुढे चहा व पान टपरी चालवित होते. उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे तर, आरोपीतर्फे वरिष्ठ ॲड. अनिल मार्डीकर व ॲड. सुमित जोशी यांनी कामकाज पाहिले.

बिरहा कुख्यात गुन्हेगार

राजू बिरहा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध नागपुरातील सदर, अंबाझरी व सोनेगाव पोलीस ठाण्यातही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला हद्दपार केले होते.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर