शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

काळामुळेच आहे सृष्टीचे अस्तित्व

By admin | Published: September 11, 2015 3:37 AM

काळाच्या प्रेरणेमुळे सूर्य या सृष्टीला प्रकाशमान करीत असून काळामुळेच या सृष्टीचे अस्तित्व आहे,

महेश्वरी प्रसाद : ‘भारत मे समय की संकल्पना’ यावर व्याख्याननागपूर : काळाच्या प्रेरणेमुळे सूर्य या सृष्टीला प्रकाशमान करीत असून काळामुळेच या सृष्टीचे अस्तित्व आहे, असे प्रतिपादन प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ. महेश्वरी प्रसाद यांनी आज येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती व्याख्यानमालेत ‘भारत मे समय की संकल्पना’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम उपस्थित होते. डॉ. महेश्वरी प्रसाद म्हणाले, काळामुळेच जमिनीची निर्मिती होऊन त्यावर प्राणिमात्रांना आश्रय घेण्यास जागा मिळाली. काळामुळेच सर्व जग सुखी होते. काळच ईश्वर, प्रजा यांचा पालक आहे. काळामुळेच तपशक्ती, दिशांची निर्मिती झाली. काळामुळे वायु प्रवाहित होऊन पृथ्वीला गती मिळते. ब्रह्म या संकल्पनेचा विस्तार झाल्यामुळे उपनिषदांमध्ये काळाची स्थिती गौण झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु वेदांताचे काही संप्रदाय काळाला ईश्वराची शक्ती म्हणून स्वीकार करतात. काळामुळे प्राणी जन्म घेतात, मोठे होतात आणि त्यांचा अस्तही होतो. काळाचे ज्ञान प्रत्यक्ष नाही, परंतु अंदाजाने घेता येते. जैनदर्शनही काळाची वास्तविक सत्ता मान्य करतो. या दर्शनानुसार काळाचे सहा द्रव्य आहेत. त्यात जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काळ यांचा समावेश आहे. पतंजली यांनी ज्यामुळे मूर्त पदार्थांची वृद्धी, ऱ्हास होताना दिसतो तो काळ अशी व्याख्या केली असल्याचे त्यांनी सांगितले. भागवतातही काळामुळेच प्राण्यांची निर्मिती आणि संहार होत असल्याचे मान्य करण्यात आल्याचे ते म्हणाले. विज्ञानाने आधुनिक काळात केलेल्या प्रगतीचे योग्य विश्लेषण आवश्यक असून या विश्लेषणाला काळाच्या कसोटीवर तपासून पाहता आले तर ही आमची मोठी उपलब्धी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांनी काळ सर्व समावेशक असून गेलेला काळ परत मिळविणे शक्य नसल्याचे सांगितले. संचालन प्रीती त्रिवेदी यांनी केले. आभार कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)