शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

आदिवासी आणि ग्रामीणांच्या गरजांवर फोकस करून प्रयोग करावेत : अनुश्री मलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 22:56 IST

वस्तुस्थिती जाणून केलेले प्रयोग अधिक प्रभावी होतात आणि आम्हाला आदिवासी व ग्रामीण गरजांना ध्यानात ठेवून प्रयोग केले पाहिजेत, असे मत आयआयटी, दिल्ली येथील सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड टेक्नालॉजीच्या इन्स्टिट्यूट चेअर प्राध्यापक व प्रमुख अनुश्री मलिक यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देनीरीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विज्ञानाचे नाव आले तर प्रयोगशाळेचा उल्लेख होतो. प्रयोगशाळेत केवळ उपलब्ध नमुन्यांवर प्रयोग होतात. त्यामुळे विज्ञान केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता त्याबाहेरील विज्ञानावर लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही जे प्रयोग करीत आहोत त्याची समाज वा इंडस्ट्रीला गरज आहे का, हे पाहण्याची आवश्यकता आहे. वस्तुस्थिती जाणून केलेले प्रयोग अधिक प्रभावी होतात आणि आम्हाला आदिवासी व ग्रामीण गरजांना ध्यानात ठेवून प्रयोग केले पाहिजेत, असे मत आयआयटी, दिल्ली येथील सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड टेक्नालॉजीच्या इन्स्टिट्यूट चेअर प्राध्यापक व प्रमुख अनुश्री मलिक यांनी येथे व्यक्त केले.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थानमध्ये (नीरी) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जवाहर नवोदय विद्यालय, नवेगांव खैरीचे डॉ. जरीन कुरैशी, नीरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित, डॉ. जे.एस. पांडेय आणि प्रकाश कुंभारे उपस्थित होते.मलिक म्हणाल्या, प्रयोग करताना अनेकदा आम्हाला विफलता मिळते. परंतु निराश न होता पुढे जावे. त्यांनी सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड टेक्नालॉजीतर्फे करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. बायोगॅसवर कार चालविणे, वॉटरलेस युरिनल, महुआच्या फूलांपासून कॅन्डी तयार करणे, उत्पादनातून दुषित पदार्थ वेगळे करणे, बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित करणे, ८० टक्के वेस्टचा रियूज करणे आदींची माहिती दिली.डॉ. पुरोहित म्हणाले, यावर्षी ‘वुमन इन सायन्स’ ही विज्ञान दिनाची थीम आहे. समाजाच्या विकासात महिलांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांची उदाहरणे दिली. डॉ. पांडेय यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचालन एस. लांबा आणि प्रकाश कुंंभारे यांनी आभार मानले. या प्रसंगी नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.‘विज्ञान ज्योती’ प्रकल्पाचे उद्घाटनयाप्रसंगी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प ‘विज्ञान ज्योती’चे उद्घाटन करण्यात आले. डॉ. जरीन कुरैशी म्हणाले, भारत सरकारने महिला आणि विद्यार्थिनींमध्ये विज्ञानाची आवड आणि महिला व पुरुष वैज्ञानिकांचे प्रमाण समान करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केला आहे. त्याच्या संचालनाची जबाबदारी नवोदय विद्यालय समितीकडे दिली आहे. याअंतर्गत देशातील ५० जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूरचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून अकरावी विज्ञान इयत्तेतून ५० मुलींची निवड केली आहे.नवोदय विद्यालयात ५० विद्यार्थिनी नसल्यास तेथील केंद्रीय विद्यालय, केंद्र सरकारच्या शाळा आणि राज्य सरकारच्या शाळांमधून विद्यार्थिनींना निवडण्यात येणार आहे. दरवर्षीकरिता २० लाख रुपये प्रकल्पासाठी वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थिनीला एक हजार रुपये शिष्यवृत्ती आणि संशोधन कार्यासाठी एक हजार रुपये देण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत वर्षभर वैज्ञानिक, रोल मॉडेलची मुलाखत, एनजीओ, प्रयोगशाळांना भेट, संशोधन कार्य आणि पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

टॅग्स :scienceविज्ञानnagpurनागपूर