जलालखेडा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी नरखेड तालुक्यातील भारसिंगी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. तीत स्थानिक शेतकऱ्यांनी पाटील यांचे विविध समस्यांकडे लक्ष वेधले. नरखेड तालुक्यात सोयाबीन व कपाशीवर आलेल्या रोगामुळे पूर्ण पीक खराब होत आहे. संत्रा-मोसंबीला फळगळती लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या समस्यकडे आपण सरकारकडे पाठपुरावा करावा व मदत करावी, अशी मागणी पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. पाटील सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. वरूड येथे जाताना सकाळी ते भारसिंगी येथे थांबले होते. भाजपचे युवा मोर्चा कार्याध्यक्ष अक्षय विरखडे, जिल्हा उपाध्यक्ष मयूर दंढारे, जलालखेडा येथील उपसरपंच मयूर सोनोने, अरुण कुमेरिया, मयूर अढाऊ, वसंत चाफले, अनुप सोलंकी, दिलेश ठाकरे, आदी याप्रसंगी उपस्थित होते.
010921\img-20210901-wa0224.jpg
फोटो ओळी. चंद्रकांत पाटील यांचे भारसिंगी येथे स्वागत करताना शेतकरी व कार्यकर्ते.