शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी व्हावे : भीमराव कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:40 IST

शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. शिक्षित होऊन शेती करण्यासह उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी होऊन विक्रीवर लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रगत संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी चर्चासत्रात ‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्दे वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल :‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर चर्चासत्रात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. शिक्षित होऊन शेती करण्यासह उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी होऊन विक्रीवर लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रगत संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी चर्चासत्रात ‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर बोलताना व्यक्त केले.शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत: संत्रा विक्रीसाठी पुढे यावे. राज्य शासनाने विक्रीची व्यवस्था केली आहे. ते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीचे मोठे साधन आहे. याकरिता थोडेफार प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आता स्वत:च बाजारात संत्री विकत असल्यामुळे अडीच पट उत्पन्न मिळत आहे. उदाहरण देताना कडू म्हणाले, कळमना बाजारात दोन हजार रुपये टन भावाने संत्री विकली जातात. त्याकरिता तीन हजार रुपये टन वाहतूक खर्च येतो. पण भावाला पुणे येथे पाठवून संत्रा विक्रीचा गट तयार केला. २० हजार रुपये टन किमतीचा संत्रा पुणे येथे पाठवितो. त्याकरिता ८ हजार रुपये वाहतूक खर्च येतो. हा संत्रा राज्य पणन महासंघाने उभ्या केलेल्या आठवडी बाजारात ५० हजार रुपये टनापर्यंत विकला जातो. या प्रक्रियेत मला २० हजार आणि भावाला २२ हजार रुपये मिळतात. सर्व उत्पन्न घरातच आहे. कडू यांची कळमेश्वर तालुक्यात पारडी-देशमुख येथे २० एकरवर संत्र्याची बाग आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलसारखे माध्यम संत्रा उत्पादकांना लोकमतने उपलब्ध करून दिले आहे. पण चर्चासत्रात शेतकऱ्यांची हजेरी कमी असल्यावर त्यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरFarmerशेतकरी