शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले भाजी बाजाराला आग, ९ गाळ्यातील साहित्य आगीत जळून खाक

By मंगेश व्यवहारे | Updated: October 18, 2023 20:38 IST

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग इलेक्ट्रिकच्या शॉट सर्किटमुळे लागली

मंगेश व्यवहारे, नागपूर: कॉटन मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा फुले भाजी बाजाराला बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत बाजारातील ९ गाळ्यातील साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार १ लाख ८० हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आग इलेक्ट्रीकच्या शॉट सर्किटमुळे लागली. आगीत प्लॅस्टीकचे कॅरेट, एसी, पंखे व फर्निचर जळून खाक झाले. आगीमध्ये निलेश सोमकुवर, रवींद्र पाटील, अब्दुल/ रहमान जब्बार गरीब दलाल, प्रदीप गुमगावकर, नितीन पटे, दामू धावडे या गाळाधारकांचे नुकसान झाले. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले.

- कोरोनाच्या काळातही लागली होती आग

कोरोनाच्या काळातही महात्मा फुले मार्केटला भिषण आग लागून दुकाने जळाली होती. त्यातही गाळेधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. महात्मा फुले भाजी बाजाराचे अद्यावतीकरण करण्याची मागणी व्यापाऱ्यांची आहे. २००४ मध्ये येथील गाळेधारकांनी बाजार बनण्यासाठी महापालिकेला काही रक्कम सोपविली होती. त्याचा अद्यापही उपयोग करण्यात आला नाही. आगीच्या घटनामुळे आणि बाजाराची झालेली दुरावस्था बघून संबंधित विभागाने यापरिसरात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी व लवकरच व्यापारी संकुल बनविण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी केली आहे.

टॅग्स :fireआग