शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

निर्मल ग्राम योजनेचा फज्जा

By admin | Published: November 11, 2014 12:57 AM

भिवापूर तालुक्यातील नांद येथे निर्मल ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र, या गावात सर्वत्र घाण पसरली आहे. येथील सार्वजनिक शौचालयाचा वापर कुणीही करीत नाही. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे

नांद येथे घाणीचे साम्राज्य : सार्वजनिक शौचालयाचा वापर होणार कधी?राम वाघमारे - नांदभिवापूर तालुक्यातील नांद येथे निर्मल ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र, या गावात सर्वत्र घाण पसरली आहे. येथील सार्वजनिक शौचालयाचा वापर कुणीही करीत नाही. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. राज्य शासनाच्यावतीने निर्मल ग्राम योजनेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. नांद येथे स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने ही योजना राबविण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाने हागणदारीमुक्त गाव करण्याचा संकल्प केल्याने या योजनेंतर्गत नांद येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. या शौचालयात पाण्यासह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, स्थानिक ग्रामस्थ या सार्वजनिक शौचालयाचा वापर न करता उघड्यावर जाणे पसंत करीत आहेत. परिणामी, लाखो रुपये खर्च करूनही या योजनेला हरताळ फासला जात आहे.सदर शौचालयाचे बांधकाम वर्षभरापूर्वी स्थानिक आठवडी बाजारालगत असलेल्या रिकाम्या जागेवर करण्यात आले. रंगरंगोटी करण्यात आलेल्या या शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्याच्या दाराला सदैव कुलूप लावले असल्याचे दिसून येते. या शौचालयाच्या शेजारी नागरिक उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम नेमके कशासाठी केले, असा प्रश्न उपस्थित होतो. गावात येणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात घाण आहे. या शौचालयापासून अवघ्या २०० मीटरवर सरपंच भारती भैसारे यांचे घर आहे. शौचालयालगत रस्ता गावात येत असल्याने या रस्त्यावरून सतत वर्दळ असते. याच रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य केंद्रही आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या - येणाऱ्या प्रत्येकाला या घाणीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून परिसरात पसरलेली घाण साफ करण्याची तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.