शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

चार वर्षांअगोदर सौंदर्यीकरणात प्रथम पुरस्कार, आता पुलावर झाला हाहाकार

By योगेश पांडे | Published: November 27, 2022 10:51 PM

बल्लारपूर रेल्वेस्थानकावर झालेल्या अपघातानंतर रेल्वे यंत्रणेच्या कार्यप्रणालीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

नागपूर : बल्लारपूर रेल्वेस्थानकावर झालेल्या अपघातानंतर रेल्वे यंत्रणेच्या कार्यप्रणालीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. चार वर्षांअगोदर रेल्वे मंत्रालयाकडून बल्लारपूर रेल्वेस्थानकाला सौंदर्यीकरणात देशात प्रथम पुरस्कार मिळाला होता. सौंदर्यीकरणावर प्रशासनाने इतके जास्त लक्ष दिले की प्रत्यक्ष पुलाच्या अवस्थेकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. त्याची परिणिती अपघातामध्ये झाली.

२०१८ साली केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्जनशीलतेसह सौंदर्यीकरणासंदर्भात देशपातळीवर स्पर्धा घेतली होती. त्यात वेगवेगळ्या झोनच्या रेल्वेस्थानकांकडून नामांकन मागविण्यात आले होते. यात स्थानिक कलाकारांचीदेखील मदत घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील ११ झोनमधून ६२ नामांक प्राप्त झाले होते. यात बल्लारपूर व चंद्रपूर या रेल्वेस्थानकांना प्रथम पुरस्कार मिळाला होता.

यानंतर मधुबनी, मदुराई, गांधीधाम, कोटा, सिकंदराबाद ही रेल्वेस्थानके होती. बल्लारपूर रेल्वेस्थानकाला सर्वोत्कृष्ट कला व नूतनीकरण झालेले सर्वोत्कृष्ट स्थानक म्हणून प्रथम पुरस्कार मिळाला होता. मात्र पुलाच्या अवस्थेकडे या नूतनीकरणात भर देण्यात आला नव्हता का तसेच चारच वर्षांत नूतनीकरण जीवघेणे कसे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर