शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
3
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
5
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
6
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात
7
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
8
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
9
Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 
10
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
11
Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
12
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
13
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
14
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
15
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
16
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
17
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
18
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
19
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

चढतोय घसरतोय..

By admin | Published: January 07, 2015 1:03 AM

गेल्या आठवड्यापासून उपराजधानीचे तापमान अक्षरश: बेभरवशाचे झाले आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत. अचानक वर गेलेला

पाऱ्याला नाही थारानागपूर : गेल्या आठवड्यापासून उपराजधानीचे तापमान अक्षरश: बेभरवशाचे झाले आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत. अचानक वर गेलेला पारा २४ तासांत अपेक्षेहून कमी तापमानापर्यंत पोहोचत आहे. मंगळवारी नागपुरात ६.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे सोमवारी किमान पारा १२.९ अंश सेल्सिअस इतका होता. दर दिवशी वातावरणात चढउतार होत असल्याने हवामानतज्ज्ञ चकित झाले आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे २०१५ या वर्षातील सुरुवातीचे दोन दिवस पावसात गेले. तत्पूर्वी २९ डिसेंबर रोजी ४५ वर्षांतील सर्वात कमी इतक्या ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मध्यंतरी रात्रीचा गारठा थोडा कमी झाला होता व सरासरी १७ अंशांपर्यंत किमान पारा गेला होता. मात्र ढगाळ वातावरण दूर झाल्याने बोचरे वारे वाहण्यास परत सुरुवात झाली आहे. मंगळवारी दिवसभर शहरात बोचरे वारे वाहत होते. सोमवारी किमान १२.९ अंशांवर असणारा किमान पारा मंगळवारी अचानक ६.६ अंशांपर्यंत खाली घसरला. किमान तापमान सरासरीहून ६ अंशांनी कमी होते.मध्यप्रदेश, छत्तीसगड व विदर्भात थंड व कोरडे वारे वाहू लागले आहेत. शिवाय उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत शीतलहर कायम राहील व पारा आणखी घसरू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)