शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:33 IST

विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिल्यात.

ठळक मुद्देनिवडणूक यंत्रणा व पोलिसांमध्ये समन्वय ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिल्यात.बचतभवन येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच विधानसभानिहाय निवडणूक अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.यावेळी अतिरिक्तजिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलिस उपायुक्त निर्मला देवी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, पोलीस उपायुक्त निलोत्पल, राहुल माकणीकर, विक्रम साळी, विवेक मसाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे, श्रीकांत उंबरकर, डॉ. शिवनंदा लंगडापुरे, हेमा बडे, श्याम मदनूरकर, अतुल म्हेत्रे, हिरामण झिरवाळ, शेखर घाडगे, शीतल देशमुख, सुजाता गंधे उपस्थित होते.निवडणूक प्रक्रियेदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार काम करताना कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सतत वरिष्ठांच्या संपर्कात राहून, अडचण असेल तिथे मार्गदर्शन घ्यावे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान संवेदनशील आणि दक्ष राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले.नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीन आणि तहसील कार्यालय परिसरात तीन अशी एकखिडकीच्या माध्यमातून स्विकारण्यात येणार आहेत. तर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांची नामनिर्देशन पत्रेही त्या-त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. यावेळी ग्रामीण मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रे स्विकारताना पोलीस उपविभागीय अधिकारी आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी समन्वय ठेवून त्या ठिकाणी उमेदवारासोबत फक्त तीन वाहनांनाच परवानगी द्यावी. त्यामुळे परिसरात गर्दी होणार नाही आणि वाहतुकीस अडथळा येणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.शहरातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारासंघातील उमेदवार कदाचित एकाच दिवशी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची शक्यता लक्षात घेता, उप जिल्हा निवडणूक अधिकारी व पोलीस यंत्रणेने १०० मीटरपरिसरात वाहनांची गर्दी होणार नाही, याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्या.निवडणुकीसंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्यानिवडणूक प्रक्रियेदरम्यान उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संबंधीत मतदारसंघातील पोलीस अधिकारी यांनी वेळोवेळी भेट घेऊन समन्वय साधावा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघातील जबाबदारी पार पाडत असताना कोणतीही अनुचित घटना घडल्यास वरिष्ठांना अवगत करावे. निवडणुकीसंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय