शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

प्रशासनावर टीका करण्यापूर्वी आधी स्वत: नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 10:19 PM

कोरोना संक्रमणापासून स्वत:चे व समाजाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शारीरिक अंतरासह इतर नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच, वाढत्या कोरोना संक्रमणाचे प्रशासनावर खापर फोडण्यापूर्वी नागरिकांनी आधी स्वत: शिस्त पाळली पाहिजे, अशी समज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्दे मुख्य न्यायमूर्तींची नागरिकांना समज : यंत्रणेवरील ताण वाढत असल्याचे निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणापासून स्वत:चे व समाजाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शारीरिक अंतरासह इतर नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच, वाढत्या कोरोना संक्रमणाचे प्रशासनावर खापर फोडण्यापूर्वी नागरिकांनी आधी स्वत: शिस्त पाळली पाहिजे, अशी समज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी गुरुवारी दिली. न्या. दत्ता गेल्या सोमवारपासून नागपूरमध्ये आहेत.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गुरुवारी न्या. दत्ता व न्या. अतुल चांदुरकर यांच्या न्यायपीठासमक्ष कोरोना मारक औषधांचा तुटवडा व इतर प्रश्नांसंदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी झाली. दरम्यान, न्या. दत्ता यांनी नागरिकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले. संपन्न वर्गातील नागरिक रोज सायंकाळी बिनधास्त बाहेर फिरायला जातात. दरम्यान, ते कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन करीत नाहीत. नागरिकांच्या अशा निष्काळजीपणामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवणे कठीण जात आहे, असे मत न्या. दत्ता यांनी व्यक्त केले. तसेच, या परिस्थितीत सुधारणा व्हावी याकरिता तीन आठवड्यांमध्ये प्रभावी उपाययोजनांची माहिती सादर करण्यात यावी, असे निर्देश याचिकाकर्ते व जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा यांना दिले.यावेळी याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कोरोना मारक औषधांच्या तुटवड्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. राज्यामध्ये सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र रेमडेसिवीरसह अन्य कोरोना मारक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. विदर्भातील रुग्णांना कोरोना मारक औषधांच्या तुटवड्याचा फटका सहन करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय