शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सोनेरी सुखासाठी...‘जुळून आल्या रेशीमगाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 08:00 IST

Nagpur News श्रद्धानंद अनाथाश्रमातील पाच जणींचे विवाह ठरले असून त्या आपल्या नव्या आयुष्यात पदार्पण करणार आहेत.

ठळक मुद्दे ‘त्या’ पाच जणी अनाथालयाचे माहेर साेडून जाणार सासरी

नागपूर : मेहंदी लागली. आज हळद लागेल अन् उद्या लग्नसोहळा पार पडून सप्तपदी घेतील अन् ‘त्या’ पाच जणींच्या आयुष्याची रेशीमगाठ बांधली जाईल. श्रद्धानंदपेठेतील श्रद्धानंद अनाथाश्रम सध्या आनंदाने फुलले आहे आणि पाचही जणी माहेरपण सोडून सासरी जाणार असल्याने हुरहूर ही राहणार आहे. पण, अनाथ म्हणून असलेली ओळख कायमची मिटणार आहे. इथून त्यांचे आयुष्यच नवे वळण घेणार आहे. एका अर्थाने त्यांच्यासाठी हा नवा जन्मच जणू.

आजवर अनाथ म्हणूनच जगणाऱ्या या मुलींना अनाथालयाचा आधार, माया आणि त्यांच्यासारख्याच मुलांची साेबत हाेती. मात्र हक्काची म्हणावी ते आईवडील आणि आपले म्हणावे असे हक्काचे घर नव्हते. ही आपलेपणाची भावना पहिल्यांदा त्यांना आता मिळणार आहे. आपला म्हणावा असा जाेडीदार, त्याचे आईवडील, नातेगाेते आणि हक्काचे म्हणावे ते घरही त्यांच्यासाठी आनंदपर्व राहणार आहे.

श्रद्धानंद अनाथालयाच्या दारात मांडव सजला आहे. गुरुवारी थाटात मेहंदी साेहळा पार पडला. पाच भावी वधूंसह अनाथालयातील चिमुकल्यांचेही हात मेहंदीने रंगले. शुक्रवारी हळद आणि संगीत कार्यक्रम हाेणार आहे आणि १८ जून राेजी सकाळी १०.३० वाजता थाटात लग्नसाेहळा पार पडणार आहे. अनाथालयासाठी ही वेळ जेवढी आनंदाची तेवढीच हृदय दाटून येणारी आहे. इतके वर्षे या अनाथाश्रमाच्या आधाराने राहणाऱ्या या पाच मुली हे माहेर साेडून सासरी जाणार आहेत. २३ वर्षांची मनीषा २१ वर्षांची उषा व संताेषी, २५ वर्षांची सेविका यांना येथे आणले तेव्हा त्या एक-दाेन वर्षाच्या अबाेध बालिका हाेत्या. सीमाला १२व्या वर्षी दुसऱ्या अनाथाश्रमातून येथे आणले हाेते. तेव्हापासून त्यांचे पालनपाेषण, शिक्षण, आराेग्य येथे झाले. लहानपणी चालण्याचा त्रास असलेल्या सेविकाच्या पायाचे २००४ व २००८ मध्ये दाेन ऑपरेशन झाले. सीमाच्या डाेळ्याचे ऑपरेशन झाले. अठरावे पूर्ण केल्यानंतर या मुलींना आधारगृहात दाखल करण्यात आले. इतकी वर्षे या ठिकाणी राहणाऱ्या या पाचही जणी कर्मचाऱ्यांसाठी मुली, चिमुकल्या अनाथांसाठी ताई आणि कुणाच्या मैत्रिणी झाल्या. चांगल्या वाईट असंख्य आठवणी असतील. या सगळ्या आठवणी साेबत घेऊन त्या नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. मग येथील प्रत्येकाच्या भावना दाटून येणार नाहीत तर नवलच.

यांच्याशी हाेणार विवाह

मनीषाचा विवाह धरणगाव, मलकापूर, जि. बुलडाणातील मुलाशी हाेणार आहे. उषाचे लग्न यवतमाळचे दिनेश भेंडारकर यांच्याशी, सेविकाचे लग्न मध्य प्रदेशातील कपिल शर्मा यांच्याशी, संताेषी ही खामला येथील सचिन भाेयर यांच्याशी तर सीमाचे लग्न उमाळी, जि. बुलडाणाचे सतीश धाेरण यांच्याशी हाेणार आहे. अनाथालयाच्या कर्मचाऱ्यांनी वधू पक्षाच्या कुटुंबाप्रमाणे आवश्यक असलेला पाठपुरावा, कागदपत्र व आराेग्य तपासणी करूनच लग्न ठरविल्याची माहिती अर्चना मेश्राम यांनी दिली.

हे करणार कन्यादान

शहरातील प्रतिष्ठित किशाेर धाराशिवकर, राजकुमार गुप्ता, दीपा पचाेरी, मनीषा यमसनवार व पाले बलजीत भुल्लर हे पाचही मुलींचे कन्यादान करणार आहेत. काही दानदात्यांनी मुलींच्या नावे एफडी केली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशाेमती ठाकूर या आवर्जून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे पदाधिकारी आणि अनाथालयाचे कर्मचारी उत्साहाने या विवाहसाेहळ्याच्या तयारीला लागले आहेत.

टॅग्स :marriageलग्न