शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपुरात रचला गेला होता रालोआ’चा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 11:48 IST

देशाच्या सत्तास्थानी येणाऱ्या भाजपाच्या नेतृत्वातील ‘रालोआ’चा (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) पाया नागपुरात रचला गेला होता. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणी ताजा करत असताना ज्येष्ठ पत्रकार व नौदलात काम केलेले जयंत (मामा) हरकरे यांनी हा खुलासा केला.

ठळक मुद्देफर्नांडिस यांनी देवरसांशी केली होती चर्चा रात्री झाली होती संघ मुख्यालयात भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या सत्तास्थानी येणाऱ्या भाजपाच्या नेतृत्वातील ‘रालोआ’चा (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) पाया नागपुरात रचला गेला होता. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणी ताजा करत असताना ज्येष्ठ पत्रकार व नौदलात काम केलेले जयंत (मामा) हरकरे यांनी हा खुलासा केला.‘लोकमत’शी विशेष चर्चा करत असताना हरकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस हे कर्मठ व देशभक्त नेता असल्याचे सांगितले. जॉर्ज यांनी श्रमिकांना संघटित केले व एक मजबूत मंच दिला. ‘रालोआ’ची निर्मिती १९९८ मध्ये झाली. मात्र याचे बीज १९९० नंतरच रोवले गेले होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी नागपुरात येऊन तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याशी चर्चा केली होती. शहरातील काही समाजवादी नेत्यांनी हरकरे यांच्याकडे या दोघांची भेट करवून देण्याची जबाबदारी सोपविली होती. यासंदर्भात जॉर्ज यांच्याशी संपर्क साधला असता, रात्री बैठक करण्याचे जॉर्ज यांनी सांगितले. रात्री ९ नंतर जॉर्ज संघ मुख्यालयात पोहोचले होते. देवरस यांनी त्यांचे स्वागत केले होते. देशाच्या वर्तमान स्थितीवरून चर्चेला प्रारंभ झाला. त्यानंतर देवरस यांनी जॉर्ज यांना १९७७ प्रमाणे विरोधी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस विरोधात मोर्चा उघडण्याचा सल्ला दिला. आणीबाणीच्या काळात आपण संघाच्या विचारधारेचा अभ्यास केला व संघ स्वयंसेवकांच्या नि:स्वार्थ कार्याने प्रभावित झालो, असे जॉर्ज यांनी देवरस यांना सांगितले होते.अशास्थितीत देवरस यांच्या सल्ल्याचा विचार करण्याचे आश्वासनदेखील जॉर्ज यांनी दिले होते. या बैठकीनंतर ‘रालोआ’साठी प्रयत्न सुरू झाले. या आघाडीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली, असे हरकरे यांनी सांगितले. जॉर्ज ‘रालोआ’चे २००८ पर्यंत संयोजक होते.

अन जॉर्ज यांनी संपादरम्यान मिळवून दिली टॅक्सीहरकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी पहिल्या भेटीबाबत यावेळी सांगितले. १९५९ साली मी नौदलात होतो. त्यावेळी विशाखापट्टणम् येथे माझी बदली झाली होती. तेथे जाण्यासाठी मुंबईला पोहोचलो तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वात संप झाला असल्याची माहिती कळली. एकही टॅक्सी चालत नव्हती. एक टॅक्सी मिळाली, मात्र त्याने जाण्यास नकार दिला. मला जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी भेटायचे आहे, असे त्याला सांगितले तेव्हा तो तयार झाला. त्यावेळी मी नौदलाच्या गणवेशात होतो. मला बंदरावर पोहोचणे अत्यावश्यक आहे. जर मी वेळेत पोहोचलो नाही तर कोर्टमार्शल होईल, असे मी जॉर्ज यांना सांगितले. जॉर्ज यांनी माझी समस्या ऐकताच टॅक्सीवाल्याला तेथे पोहोचून देण्यास सांगितले, असे हरकरे यांनी सांगितले.

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिस