शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

नागपूर जिल्ह्यातील पेंचच्या कालव्यात चौघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:33 IST

पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या मार्गावरून येत असलेली भरधाव मोटरसायकल स्लीप झाली. त्यात मोटरसायकलवरील तिघेही कालव्यात पडले व वाहून जाऊ लागले. मागाहून येणाऱ्या  दुसऱ्या  दुचाकीवरील तरुण त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला असता, त्या तिघांसोबत तोही वाहून गेला.

ठळक मुद्देपती - पत्नीचा समावेश : माहुली - मनसर मार्गावरील दुर्दैवी घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या मार्गावरून येत असलेली भरधाव मोटरसायकल स्लीप झाली. त्यात मोटरसायकलवरील तिघेही कालव्यात पडले व वाहून जाऊ लागले. मागाहून येणाऱ्या  दुसऱ्या  दुचाकीवरील तरुण त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला असता, त्या तिघांसोबत तोही वाहून गेला. या घटनेत चौघेही बुडाले. यापैकी दोघींचे मृतदेह सापडले असून, दोघांचा शोध सुरू आहे. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुली - मनसर दरम्यानच्या कालव्याच्या मार्गावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.कमलेश लालचंद जैन (कवाड) (२७), त्यांची पत्नी अंजली कमलेश जैन (कवाड) (२४), त्यांची बहीण प्रियंका राजू जैन (कवाड)कवाड (२३) तिघेही रा. महाजनवाडी, बोंद्रे ले आऊट, मनसर, ता. रामटेक व कमलेश जैन यांचा मावसभाऊ आशिष नरेंद्र जैन (गोलछा) (२३, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. आशिष हा कमलेश जैन यांच्याकडे पाहुणा म्हणून आल्याने या सर्वांसोबत पायल राजू जैन (कवाड) (२०, रा. महाजन वाडी, बोंद्रे ले आऊट, मनसर, ता. रामटेक) हे पेंच जलाशय परिसरात फिरायला जात होते. कमलेश, अंजली व प्रियंका एका मोटरसायकलवर तर आशिष व पायल स्कूटीवर होते.दरम्यान, कालव्याच्या पुलाजवळ कमलेशची मोटरसायकल स्लीप झाली आणि तिघेही कालव्यात पडले. आशिष स्कूटी थांबवून त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने चौघेही वाहून जाऊ लागले. त्यातच पायलने आरडाओरड केली. त्यामुळे जवळच असलेल्या हुकूमचंद बिरो यांनी शिवारातील नागरिकांना मदतीला बोलावले. नागरिकांनी अंजली व प्रियंका यांचे मृतदेह घटनास्थळापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या पटगोवारी नदीजवळ काठीने कालव्याच्या कडेला लावले. मात्र, कमलेश व आशिष वाहून गेले. माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी कमलेश व आशिषला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अंधारामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत होत्या. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.मनसर येथे शोककळाकमलेश व अंजली यांचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. जैन कुटुंबीय मनसर येथील किराणा व्यावसायिक आहेत. ते सर्व आशिष जैन यांच्यासोबत पेंच डॅम परिसरात फिरायला गेले होते. ज्या ठिकाणी कमलेश यांची मोटरसायकल स्लीप झाली, त्या ठिकाणी रेती असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कमलेशची मोटरसायकल कालव्याच्या काठावर अडकली होती. या घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, दोघे वाहून गेल्याने जैन कुटुंबीयांसह मनसर येथे शोककळा पसरली.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू