शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नागपुरातील नाईक तलावाचा निधी थांबविला, संवर्धनही थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:31 IST

शहरातील प्रमुख व ऐतिहासिक जलाशयांपैकीच एक असलेल्या नाईक तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरणाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. परंतु आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेने या प्रकल्पाचा निधी थांबविला आहे. यामुळे संवर्धनाचे काम थांबले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील प्रमुख व ऐतिहासिक जलाशयांपैकीच एक असलेल्या नाईक तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरणाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. परंतु आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेने या प्रकल्पाचा निधी थांबविला आहे. यामुळे संवर्धनाचे काम थांबले आहे.गत काळात या तलावातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जात होता. परंतु तलावाच्या सभोवताल झालेले अतिक्रमण व तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. तसेच अतिक्रमणाचा विळखा वाढत चालल्याने तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तलाव संवर्धन योजनेंतर्गत महापालिकेने नाईक तलावाचे काम हाती घेतले आहे. ‘नीरी’ ने ३.८३ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर केला. पाच वर्षांत ५ लाख देखभाल खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार कामाला सुरुवात केली होती. परंतु शासनाकडून निधी प्राप्त झाल्याशिवाय पुढील काम करू नये, अशा सूचना मनपाच्या वित्त विभागाने कंत्राटदाराला दिल्या आहेत.तलाव परिसरातील वस्त्यांतील सिवरेज व घाण पाणी तलावात सोडण्यात येत आहे. यामुळे पाण्याला दुर्गंधी येते. तसेच तलाव पात्रात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली होती. याचा विचार करता तलाव परिसरातील अतिक्रमण हटविणे, वाढलेली झुडपे व गाळ काढणे, तलावात सोडण्यात येणारे सिवरेज बंद करणे, तलाव परिसरातील सौंदर्यीकरण अशा स्वरूपाची कामे प्रस्तावित आहेत.सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पतलावात तीन सिवरेज लाईन सोडण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रदूषण होत असल्याने तलावात सोडण्यात येणारे सिवरेज रोखण्यासाठी १.८ एमएलडी क्षमतेचे तीन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. तलावाच्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. गांधीसागर तलावाच्या धर्तीवर या तलावाचा विकास केला जाणार आहे. परंतु मनपा प्रशासनाने निधी थांबविल्याने तलावाचे काम मागील दोन महिन्यापासून बंद असल्याची माहिती माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNaik Lakeनाईक तलाव