शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गांधीजींची माकडं पोहोचली आरटीओ कार्यालयाच्या भिंतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 11:40 IST

आरटीओ कार्यालयात कोणतेच काम अतिरिक्त पैसे किंवा लाच दिल्याशिवाय होत नाही, असा समज आहे. कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचा उपयोग करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनव्या तीन संदेशासोबत येणाऱ्यांसाठी आरसाही लावला

सय्यद मोबीन

नागपूर : दलालांच्या विळख्याने कालपर्यंत चर्चेत असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या भिंतीवर महात्मा गांधींची संदेश देणारी तीन माकडं पोहोचली आहेत. एवढेच नव्हे तर या माकडांच्या प्रतिमांच्या शेजारीच एक आरसाही लावण्यात आला आहे. उत्तम नागरिक बना, असा संदेश देण्यासोबतच स्वत:लाही तपासण्यासाठी आरसा बघा, असा संदेशच या निमित्ताने हे कार्यालय देत आहे.

आरटीओ कार्यालयात कोणतेच काम अतिरिक्त पैसे किंवा लाच दिल्याशिवाय होत नाही, असा समज आहे. परंतु, ऑनलाइन व्यवहारामुळे ही परिस्थिती बदलली आहे. दलालांचा वावर कमी करण्यासोबतच कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या जुन्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न हे कार्यालय करीत आहे. याच संकल्पनेतून शहर आरटीओ रवींद्र भुयार यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांनी नागरिकांना चांगले व्यक्ती होण्याचा संदेश देणारे पोस्टर कार्यालयात लावले आहेत. या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.

या उपक्रमासाठी महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचा उपयोग करण्यात आला आहे. ही माकडं त्यांच्या नियमित संदेशाऐवजी चांगला विचार करा, चांगले पहा व चांगले बोला असे तीन संदेश देत आहेत. लागूनच एक आरसा लावण्यात आला असून, त्याखाली ‘चांगला’ असे लिहिण्यात आले आहे. या आरशात पाहा आणि स्वत:ला तपासा, असा विचार यातून पेरला जात आहे. आरटीओ कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी प्रामाणिकपणे वागावे व भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देऊ नये, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.

विचार चांगले तर सर्वच चांगले

चांगला विचार केला, चांगले पाहिले व चांगले बाेललो तर सर्वकाही चांगले होते. त्यामुळे हा उपक्रम सुरू केला. सर्वांनी या उपक्रमातून प्रेरणा घेऊन स्वत:ला उत्तम नागरिक बनवणे अपेक्षित आहे.

- रवींद्र भुयार, आरटीओ (सिटी)

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसSocialसामाजिक