शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

सहा महिन्यात महाविकासआघाडीचे सरकार कोसळेल  : गिरीश व्यास यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 21:20 IST

आतापासून सहा महिन्यात म्हणजे पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत हे सरकार निश्चितपणे कोसळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

ठळक मुद्देसरकारची गती थांबली, मती भ्रष्ट झाली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडीच्या शासनकाळात राज्यातील विकास योजना थांबविल्या जात आहेत. या सरकारची गती थांबली असून मती भ्रष्ट झाली आहे. आतापासून सहा महिन्यात म्हणजे पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत हे सरकार निश्चितपणे कोसळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.हे सरकार सुरू होण्याच्या अगोदरच गडगडण्याच्या स्थितीत आले आहे. सरकार आले तेव्हाच हे किती दिवस चालेल याची चर्चा जनतेमध्ये होती. ज्या पद्धतीने सरकारचे काम सुरू आहे त्यावरुन हेच दिसून येत आहे. आम्ही विकासाच्या कामाला गती देऊ, विचारपूर्वक काम करु, सरकारचे काम द्वेषपूर्ण राहणार नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. मात्र यांनी ज्या पद्धतीने विकासाच्या योजनांना थांबविण्याचे काम केले आहे त्यावरुन एकप्रकारे ते महाराष्ट्राच्या विकासाला अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आम्हाला आॅपरेशन कमळ राबविण्याची आवश्यकता नाही. कर्नाटकचे राजकारण सर्वांनी पाहिले. लोकशाही पद्धतीने तेथे निर्णय आला. आता ईव्हीएमबाबत कुणीही बोलत नाही. जनतेने तेथे भाजपाला कौल दिला आहे, असे ते म्हणाले.महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणूमहाविकास आघाडीने सत्ता सोडली तर निश्चित निवडणुकांना सामोरे जाऊ व एकट्याच्या ताकदीने सरकार स्थापन करून दाखवू. निवडणुकीची स्थिती आली तर आमची नेहमीच तयारी आहे, असा विश्वासदेखील गिरीश व्यास यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Girish Vyasगिरीश व्यासPoliticsराजकारणMediaमाध्यमे