शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
5
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
6
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
7
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
8
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
9
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
10
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
11
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
12
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
13
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
14
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
15
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
16
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
17
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
18
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
19
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?

मुस्लिमांमधील मागास जातींना आरक्षण द्या, नाना पटोले यांची मागणी

By कमलेश वानखेडे | Published: November 22, 2023 1:12 PM

मराठा विरुद्ध ओबीसी पेटविण्याचे काम सरकार प्रायोजित

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिले आहे की, आरक्षण हा मागास समाजाचा अधिकार आहे. जनगणना करीत नसल्यामुळे हे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. मुस्लिम धर्मातही मागास जाती खूप आहेत. मुळात हा धर्माचा प्रश्न होऊ शकत नाही. मुस्लिम धर्मातील ज्या मागास जाती आहेत त्यांनाही जनगणना करून आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली.

पटोले म्हणाले, छत्तीसगडमध्ये आदिवासी, ओबीसी, एससीमध्येही आरक्षणात वाढ करण्यात आली. महाराष्ट्रातही मुस्लिमांच्या मागास जाती असतील त्यामध्ये आरक्षणाची वाढ करण्यात येईल, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मराठा विरुद्ध ओबीसी हे सरकार प्रायोजित होऊन घडवत आहे. राज्यातील एक मंत्री एका समूह बरोबर जाऊन चॅलेंज करत असेल तर लक्षात आले पाहिजे की हे सरकार प्रायोजित महाराष्ट्राला पेटवण्याचे काम सुरू आहे, असा थेट आरोपही पटोले यांनी केला.

शेड्युल दहाप्रमाणे सर्वाधिकार माननीय अध्यक्ष यांचे आहेत. मात्र, वेळेच्या बंधनात निर्णय घेणे अपेक्षित होते. सुप्रीम कोर्टाला अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढावे लागले हेच विधिमंडळाच्या व्यवस्थेला कलंक लावण्याचा काम आताचे लोक करतात. सुनील प्रभूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो असे आपल्या साक्षीमध्ये सांगितले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख सुद्धा प्रोसिडिंगमध्ये येऊ द्यायचा नाही, या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांचे बाजूने कारवाई होत असेल तर ते फारच चुकीचे आहे. अधिवेशनात आम्ही याची चर्चा करू. अध्यक्षांना अधिकार असतात मात्र ज्याप्रमाणे विधिमंडळाचे कामकाजाला काळीमा लावण्याचे काम होत असेल तर त्यात आम्हाला शांत बसता येणार नाही,आम्ही जाब विचारू, असा इशाराही पटोले यांनी दिला.

संत तुकारामांचा अपमान करणाऱ्यांकडे कसे जाता ?

- संत तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्यांकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी जावे किंवा जावू नये, आमच्यासाठी इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या पैशाचा चुराडा आणि लूट करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भंडारा येथे मुख्यमंत्र्यांनी रोड शो केला. मात्र लोकच नव्हते. त्यांनी काय प्रचार करावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या शो नंतर संघटनांनी रस्ता रोको केला, अशी टीकाही त्यांनी केली.

खेळात राजकारण नको

- राहुल गांधी राजस्थानमध्ये भाषण देत असताना तरुणांनी आवाज मारला. सोशल मीडियावर पनौती शब्द प्रचलित झाला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतलेले नाही. भाजप तसे म्हणते आहे. अंतिम सामन्यासाठी भारतीय टीमला राहुल व प्रियांका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. ज्या पद्धतीने खेळात राजकारण तयार करण्याचे काम सुरू झाले आहे, ते योग्य नाही. खेळात राजकारण येऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी भाजप नेत्यांना दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेMuslimमुस्लीमreservationआरक्षणcongressकाँग्रेसBJPभाजपा