शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला : आशिष देशमुख यांचा आमदारकीला ‘रामराम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 9:13 PM

मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. मात्र त्यांनी अद्यापही भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.

ठळक मुद्देभाजपला अद्याप सोडचिठ्ठी नाही, काँग्रेसचा हात पकडणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. मात्र त्यांनी अद्यापही भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.आशिष देशमुख हे काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातून २०१४ साली निवडून आले होते. मात्र वर्षभरानंतरच देशमुख यांनी राज्य शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनही केले होते. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख राजीनामा देतील असे अंदाज लावण्यात येत होते, मात्र त्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. अखेर मंगळवारी त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले. बुधवारी ते मुंंबईला जाऊन विधानसभा अध्यक्षांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, देशमुख यांच्या पुढील राजकीय भविष्याबाबत विविध कयास लावण्यात येत असून ते पुढील निवडणूक नेमकी कुठून लढणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.सेवाग्राममध्ये राहुल गांधींचे केले स्वागतआशिष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना राजीनाम्याचे पत्र पाठविले व त्यानंतर त्यांनी थेट सेवाग्राम गाठले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेदरम्यान देशमुख यांनी मंचावर येऊन त्यांचे स्वागत केले व एक पुस्तकदेखील भेट दिले. यावेळी दर्शकांमध्ये त्यांचे वडील व माजी मंत्री रणजित देशमुख हेदेखील उपस्थित होते.अद्याप काँग्रेस प्रवेश नाही : आशीष देशमुख‘लोकमत’ने आशिष देशमुख यांच्याशी संपर्क केला असता अद्याप आपण काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी मी विदर्भात सगळीकडे फिरलो. येथील शेतकरी, तरुणाईच्या समस्या मागील चार वर्षांपासून सुटलेल्या नाही. यासंदर्भात पक्ष व राज्य सरकारकडे मी वारंवार लक्ष वेधले, मात्र यात कोणताही फरक दिसला नाही. शेतकरी व जनतेचा सरकारने भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सत्याचा मार्ग स्वीकारत मी राजीनामा दिला आहे. मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. यापुढील निर्णय मी लवकरच घेईल, असेदेखील त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखMLAआमदार