शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

शासनाचा मराठी भाषा पंधरवडा पुणे, मुंबईपुरताच, श्रीपाद जोशी यांचा आराेप

By निशांत वानखेडे | Published: January 16, 2024 6:45 PM

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला.

नागपूर : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने १४ जानेवारीपासून मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त जाहीर केलेला ‘साहित्य सेतू’ उपक्रम पुणे, मुंबईपुरता मर्यादित आहे का, असा सवाल अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. अशा प्रकारामुळे राज्यातील इतर विभागांत विलगतेची भावना निर्माण हाेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला. याबाबत मराठी भाषा विभागाला तसेच मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, विश्वकोश मंडळाचे सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी ही खंत व्यक्त केली. हा प्रश्न महाराष्ट्रातील इतर विभागांना व बृहन्महाराष्ट्रातीलही संबंधितांना पडत असतो, हे लक्षात ठेवणे हेदेखील शासनाचेच काम व हे पुन:पुन्हा शासनाच्या लक्षात आणून द्यावे लागते, हे मराठीचे दुर्दैव आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आम्ही महाराष्ट्राचेच भाग आहोत, वेगळ्या राज्याचे नव्हे, याचे स्मरण शासनाला करून द्यावी लागते, ही खंत आहे. अशा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागांतील प्रतिभेला सहभागी करण्याचे धोरण शासनाने राबवायला हवे. अशा कार्यपद्धतीमुळेच विविध विभागांत विलगतेची भावना प्रबळ होण्यास खतपाणी मिळते आणि महाराष्ट्र संयुक्तच राखू इच्छिणाऱ्यांचे बळ क्षीण केले जाते आहे. त्यायोगे भाषिक, सांस्कृतिक ऐक्याला देखील बाधा पोहोचते, हेदेखील डॉ. जोशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. महाराष्ट्रातील इतर विभागांतदेखील मान्यवर लेखक, प्रतिभा, विद्वत्ता आहे, याचे भान शासनाने राखले पाहिजे, असेही या पत्रात डॉ. जोशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर