शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कळमन्यात धान्य भिजले, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

By मोरेश्वर मानापुरे | Published: March 16, 2024 10:40 PM

धान्य लिलावाच्या शेडवर झाड पडले.

नागपूर : नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी दुपारी आलेल्या वादळी पावसाने परिसराची धूळधाण केली. मुख्यत्वे धान्य बाजारात रस्त्यावर ठेवलेले धान्य अचानक भिजले. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बाजार समितीच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे नुकसान झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. 

शनिवारी सकाळी आकाशात ऊन होते. मात्र दुपारनंतर पावसाचे वातावरण तयार झाले आणि दुपारी ३.३० पूर्वी पावसाच्या हलक्या सरी येऊ लागल्या. तेव्हाच शेतकरी, अडतिया आणि व्यापाऱ्यांनी धान्य ताडपत्रीने झाकले. पण ३.३० नंतर तब्बल ३० मिनिटे आलेल्या मुसळधार वादळी पावसाने शेडबाहेर रस्त्यावर ठेवलेले आणि ताडपत्रीने झाकलेले हरभरे, तूरी आणि सोयाबीन भिजले. यामध्ये शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. त्यातच एका धान्य लिलावाच्या शेडवर निलगिरीचे झाड पडल्याने शेडचे नुकसान झाले.

धान्य बाजार अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे म्हणाले, पावसानंतर धान्याचा लिलाव बंद झाला, पण धान्याचे वजन करणे सुरू होते. सध्या बाजारात हरभरा, तूरी आणि सोयाबीनची आवक सुरू आहे. कळमन्यात दररोज हरभरा ५ हजारांहून अधिक पोते, तूर ३ हजार आणि सोयाबीन ५०० पोत्यांची आवक आहे. उन्हाळ्यात पावसाची चिन्हे नसल्याने बरेचसे धान्य शेडबाहेरच होते. धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

टॅग्स :nagpurनागपूर